टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • कॅलेंडरवरील नरेंद्र मोदी, कैलाश सत्यार्थी, अमर्त्य सेन, देवेंद्र फडणवीस आणि नोटेची एक बाजू कोरी आलेला अभागी माणूस
  • Fri , 13 January 2017
  • विनोदनामा Vinodnama टपल्या Taplya नरेंद्र मोदी Narendra Modi कैलाश सत्यार्थी Kailash Satyarthi अमर्त्य सेन Amartya Sen देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis

१. भाजपच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत भाजपच्या ठाणे-पुणे-मुंबईतील नेते व पदाधिकाऱ्यांनी आगामी महानगरपालिका निवडणुका स्वबळावर लढवण्याचा आग्रह धरला असला, तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत सावध भूमिका घेतली आहे.

ही बातमी शिवसेनेबरोबरच्या युतीच्या संदर्भात आहे, अशीच तुमची समजूत झाली आहे ना? तसं नाहीये. शिवसेनेशी युती केल्याने फारसं काही बिघडत नाही. या निवडणुका स्वबळावर म्हणजे भाजपच्या निष्ठावान कार्यकर्त्यांना तिकीटं देऊन लढवाव्यात, राष्ट्रवादी काँग्रेसकडून आयात केलेल्या उसन्या बळावर लढवू नयेत, असं म्हणायचंय कार्यकर्त्यांना. आता 'इलेक्टोरल मेरिट' कधी असतं का सामान्य, निष्ठावान कार्यकर्त्यांमध्ये? मुख्यमंत्री तरी बिचारे काय सांगणार?

…………………………..…………………………..

२. रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर वाय. व्ही. रेड्डी आणि बिमल जलान यांच्यापाठोपाठ आता नोबेल पुरस्कारविजेते अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन यांनी रिझर्व्ह बँकेच्या स्वायत्ततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. रिझर्व्ह बँकेच्या अखत्यारित येणारे सर्व निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदीच घेत आहेत, असं अमर्त्य सेन यांनी म्हटलं आहे.

अहो सेनसाहेब, देशात सर्वांत मोठे अर्थतज्ज्ञ कोण आहेत? सर्वांत मोठे देशभक्त कोण आहेत? सर्वांत कर्तबगार, धडाडीचे नेते कोण आहेत? सर्वांत विद्वान कोण आहेत? सगळ्यांमध्ये निडर, बेडर कोण आहेत? या सगळ्या प्रश्नांचं जर एकच उत्तर असेल, तर मग निर्णय कोण घेणार? नरेंद्र मोदीच घेणार ना?

…………………………..…………………………..

३. काही दिवसांपूर्वी मध्य प्रदेशात गांधीजींचा फोटो नसलेल्या दोन हजारांच्या नोटा एका शेतकऱ्याला एटीएममधून मिळाल्या होत्या. यावेळी त्याच राज्यातल्या एका रहिवाशाला एटीएममधून एक बाजू पूर्णपणे कोऱ्या असलेल्या नोटा मिळाल्या आहेत.

अहो, घाईघाईत होतं असं. एवढ्या नोटांच्या प्रिंटिंगमध्ये किरकोळ मिस्टेक तर होणारच ना? उलट ही बेस्टच आयडिया सापडली. एकदम वेगळ्या प्रकारच्या नोटांचं डिझाइन होईल हे. बनावट नोटा बनवणारेही गोंधळात पडतील, एकच बाजू छापायची तर कोणती बाजू छापायची म्हणून. शिवाय नोटा कॅन्सल करण्याची वेळ आली की, तेही काम सोप्पं. दोन बाजू रद्द करायला नकोत, एकच बाजू रद्द करायची. म्हणजे निम्म्या खर्चाची बचत. आहे ना खरी अर्थक्रांती!

…………………………..…………………………..

४. नोटाबंदीच्या निर्णयामुळे मानवी तस्करीला म्हणजे देहविक्रयासाठी होणाऱ्या स्त्रियांच्या बेकायदा वाहतुकीला, लहान मुलांच्या वाहतुकीला आळा बसेल, असं सुरुवातीला वाटलं होतं. पण, या व्यवसायात आता २००० रुपयांच्या नोटेचा सर्वाधिक वापर होत आहे, अशी खंत नोबेल पारितोषिक विजेते कैलाश सत्यार्थी यांनी व्यक्त केली.

नोबेल पुरस्कार मिळालेला असला आणि आपल्या अभ्यासाचा विषय असला म्हणून काहीही बोलत सुटतात हे लोक. मानवी तस्करीशी कसलाही संबंध नसलेल्या वस्त्रोद्योग खात्याच्या मंत्री स्मृती इराणी यांनी स्पष्टपणे सांगितलंय ना की, नोटाबंदीमुळे मानवी तस्करीला आळा बसलाय! मग बसलाय म्हणजे बसलाय! तुम्ही काय त्यांच्यापेक्षा जास्त हुशार आहात का?

…………………………..…………………………..

५. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खादी ग्रामोद्योग महामंडळाच्या कॅलेंडरवरची चरखा चालवणाऱ्या महात्मा गांधीजींची छबी उडवून त्याजागी आपल्या छबीची प्रतिष्ठापना केली आहे. खादीच्या आणि चरख्याच्या रूपाने स्वातंत्र्यलढ्याला देशव्यापी प्रतीकं मिळवून देणाऱ्या राष्ट्रपित्याच्या या गच्छंतिविरोधात खादी ग्रामोद्योग विभागाच्या कर्मचाऱ्यांनी गांधीजींच्याच मार्गाने आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.

कशाला उगाच वेळ घालवतायत ही मंडळी? तो जुना इतिहास विसरा आता. भारताला खरं स्वातंत्र्य मिळालंय २०१४ साली. आता आपले राष्ट्रपती, राष्ट्रपिता, राष्ट्रदादा, राष्ट्रकाका, राष्ट्रमामा सगळं काही एकच आहेत. लवकरच नोटांवरही नव्या राष्ट्रपित्याची छबी विराजमान होईल पाहा.

editor@aksharnama.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण पंधरावे - ‘देश धोक्यात आहे’, असे हिंदुत्ववादी आणि लिबरल दोघांनाही वाटत होते. हिंदुत्ववाद्यांना वाटत होते, मुसलमानांकडून धोका आहे; लिबरल्सना वाटत होते, फॅसिस्ट शक्तींकडून...

२०१४पासून धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह अनेक मतदारांना पडला, हे नाकारता येणार नाही. हे घडून आले, याचे कारण भारताला गांधीजींच्या धर्मभावनेवर आधारलेल्या राजकारणाच्या विचारांचा विसर पडला होता, हे असेल का, असा विचार अनेकांच्या मनात तरळून जाऊ लागला. ‘लिबरल विचारवंत’ स्वतःशी म्हणत होते की, भारतीय जनतेला पडलेला धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह हे फक्त इतिहासाचे एक छोटेसे आवर्तन आहे.......

बंद करा ‘निर्भय बनो!, या राष्ट्राची ‘भयमुक्ती’च्या दिशेनं इतकी वेगानं वाटचाल चालू असताना, तुम्ही पण ‘निर्भय’ व्हा की! ‘राष्ट्रीय प्रवाहा’त सामील व्हा! बंद करा, तुमचं ते ‘निर्भय बनो’!

पोलीस शांत बसणार किंवा मदत करणार, याची खात्री असेल तरच ‘निर्भय’ता येणारच ना? निःशस्त्र सामान्य माणसं-मुलं मारणं, शत्रूच्या स्त्रियांवर बलात्कार करणं, हे शौर्यच आहे. म्हणजे ‘निर्दय बनो!’ हाच आजचा मंत्र आहे. एकच पक्ष, एकच नेता, त्याचा एकच उद्योगपती, एकच कायदा, एकच देव एकच भाषा, असं सगळं ‘एकी’करण झालं की, ते पूर्ण ‘निर्भय’ होतील. एकदा ते पूर्ण ‘निर्भय’ झाले की, जग ‘भयमुक्त’ झालंच समजा .......

बाबा आढाव : “भारतीय संविधानाची मोडतोड सुरू झाली आहे. त्यामुळे आता ‘संविधान बचावा’ची चळवळ सुरू झाली पाहिजे. डॉ. बाबासाहेबांनी तयार केलेल्या राज्यघटनेचं संरक्षण हा ‘राजकीय अजेंडा’ झाला पाहिजे.”

पंतप्रधानांच्या विरोधात बोलणं हा ‘देशद्रोह’ समजला जाऊ लागला आहे. या परिस्थितीतून पुढं काय निर्माण होईल, याचं विश्लेषण करत हात बांधून चूप बसण्याची ही वेळ नाही. चर्चा करण्याऐवजी काय निर्माण व्हायला हवं, यासाठी संघर्ष करण्याची वेळ आली आहे. यात जेवढे लोक पुढे येतील, त्यांना बरोबर घेऊन थेट संघर्ष सुरू करायला. हवा. प्रसंगी आपल्याला प्रस्थापित विचारवंत ‘वेडे’ म्हणतील, पण संघर्ष सुरू करायला हवा. गप्प बसण्याची ही वेळ नाही.......

प्रभा अत्रे : वंदे गानप्रभा स्वरयोगिनी, नादरूप अनूप बखानी । स्वर लय ताल सरस कहाई, रागरूप बहुरूप दिखायी, कलाविद्या सकल गुण ग्यानी, सृजन कहन सब ही जग मानी।

ललितरचनांमधला प्रभाताईंचा मुलायम तरल आवाज अंत:करणात रुतून बसे. मंद्र अथवा तार सप्तकात कुठेही सहजपणे वावरणारा, त्यांचा भावार्त सूर त्या काव्याचा अर्थ ऐकणाऱ्याच्या थेट काळजाला भिडवे. विचारांच्या बैठकीमुळे येणारा गहिरेपणा, संवेदनशील दर्दभरा आवाज आणि त्यातलं ओथंबलेलं रसिलेपण... प्रभाताईंची सरगम हा तर रसिकांना खास तृप्त करणारा आविष्कार. सरगमला खऱ्या अर्थानं त्यांनी संगीतजगतात प्रतिष्ठा मिळवून दिली .......