पुरुषांचा ‘बँड’ वाजवणाऱ्या बायका!
संकीर्ण - फोटोएसे
टीम अक्षरनामा
  • या लेखातील सर्व छायाचित्रं ही बीबीसी, डीएनए आणि हिंदू या वर्तमानपत्रांच्या संकेतस्थळावरून घेतलेली आहेत. त्यांचे सर्वाधिकार त्यांच्याकडे आहेत
  • Tue , 20 December 2016
  • नारी गुंजन सरगम बँड Nari Gunjan Sargam Band बिहार Bihar दानापूर Danapur महादलित महिला Mahadalit women

बँड पथक हे नेहमी पुरुषांचं असतं. त्यामुळे ‘त्याचा बँड वाजला!’ हे विधानही पुरुषांविषयीच केलं जातं. बिहारमधील महादलित समाजाच्या १२ महिलांनी मात्र पुरुषांचा हा बँड दोन्ही पद्धतीनं वाजवायला सुरुवात केली आहे. वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये त्यांचं बँड पथक आपली कला सादर करतं आणि त्यांच्या गावातील बायकोला बडवणाऱ्या पुरुषांचाही प्रसंगी ‘बँड’ही वाजवतं. त्याचं नाव आहे, ‘नारी गुंजन सरगम बँड’!

याची सुरुवात झाली ती २०१३मध्ये. बिहारमधील महादलित समाजाच्या महिलांसाठी काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या सुधा वर्गीस यांना ही कल्पना सुचली. त्यांनी बिहारची राजधानी, पटनापासून जवळ असलेल्या दानापूर गावातील १२ शेतमजूर महिलांना बँडचं प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली.

शेतमजुरी करणाऱ्या महिलांचा या पथकात समावेश असल्यानं शेतातील व घरातील काम संपल्यावर त्या रोज एक तास बँड वाजवण्याचा सराव करत. सलग सहा महिने सराव केल्यानंतर त्यांचं पथक तयार झालं.

महादलित समाजाच्या महिलांचा बँड पथकापर्यंतचा प्रवास सोपा नक्कीच नव्हता. घरातील व गावातील पुरुषांनी तर त्यांना विरोध केलाच, पण महिलांनाही विरोध केला. एका महिलेला तर तिच्या नवऱ्यानं बँड पथकात सामील झाल्यामुळे चांगलंच झोडपलं. पण तरीही ती पथकात सामील झाली.

या पथकाला अनेकदा धमक्याही दिल्या गेल्या आहेत. पण या ‘बँड वाजवणाऱ्या’ बायका काही बधल्या नाहीत!

या बँडमधील सर्वच महिला निरक्षर आणि शेतमजूर आहेत, पण त्या बँडवर सहजपणे वेगवेगळी गाणी वाजवतात.

त्यामुळे त्यांच्या आयुष्यात नव्या बदलाबरोबर आर्थिक कमाईही वाढली आहे. बँड वाजवून काय पोट भरणार आहे का, असं विचारत बायकोला बडवणाऱ्या नवऱ्याला जेव्हा त्याच्या बायकोनं बँड पथकातील कामाचे पहिले ५०० रुपये दिले, तेव्हा तोही हैराण झाला.

विशेष म्हणजे या बायका पुरुषांचाही बँड वाजवतात! म्हणजे त्या गावातील महिलांच्या मदतीलाही धावून जातात. जो नवरा आपल्या बायकोला मारतो, त्याला धमकावयाला हे पथक कमी करत नाही. कधी कधी त्याची धुलाईही करतात.

उत्तर प्रदेशातील ‘गुलाबी गँग’ आता सर्वांना माहीत झाली आहे. तिच्यावर चित्रपट आला, पुस्तकं आलं. लेखांना तर गणतीच नाही.  ‘नारी गुंजन सरगम बँड’ही दोन्ही आघाड्यांवर यशस्वी होवो. असाच पुरुषांचा बँड वाजवत राहो.

या पथकातील महिला या २५ ते ६० या वयोगटातील आहेत. त्यांचं पथक लग्न, स्वागत समारंभ आणि इतर कार्यक्रमांची निमंत्रणं स्वीकारतं. त्यांनी आतापर्यंत बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार यांच्या कार्यक्रमापासून पंचतारांकित हॉटेल्स, शिक्षणसंस्था यांच्यासाठीही कार्यक्रम केले आहेत. आता त्यांना राज्याबाहेरूनही कार्यक्रमाची निमंत्रणं येऊ लागली आहेत.

editor@aksharnama.com

Post Comment

Bhagyashree Bhagwat

Wed , 21 December 2016

An Interesting Photo Feature!


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण पंधरावे - ‘देश धोक्यात आहे’, असे हिंदुत्ववादी आणि लिबरल दोघांनाही वाटत होते. हिंदुत्ववाद्यांना वाटत होते, मुसलमानांकडून धोका आहे; लिबरल्सना वाटत होते, फॅसिस्ट शक्तींकडून...

२०१४पासून धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह अनेक मतदारांना पडला, हे नाकारता येणार नाही. हे घडून आले, याचे कारण भारताला गांधीजींच्या धर्मभावनेवर आधारलेल्या राजकारणाच्या विचारांचा विसर पडला होता, हे असेल का, असा विचार अनेकांच्या मनात तरळून जाऊ लागला. ‘लिबरल विचारवंत’ स्वतःशी म्हणत होते की, भारतीय जनतेला पडलेला धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह हे फक्त इतिहासाचे एक छोटेसे आवर्तन आहे.......

बंद करा ‘निर्भय बनो!, या राष्ट्राची ‘भयमुक्ती’च्या दिशेनं इतकी वेगानं वाटचाल चालू असताना, तुम्ही पण ‘निर्भय’ व्हा की! ‘राष्ट्रीय प्रवाहा’त सामील व्हा! बंद करा, तुमचं ते ‘निर्भय बनो’!

पोलीस शांत बसणार किंवा मदत करणार, याची खात्री असेल तरच ‘निर्भय’ता येणारच ना? निःशस्त्र सामान्य माणसं-मुलं मारणं, शत्रूच्या स्त्रियांवर बलात्कार करणं, हे शौर्यच आहे. म्हणजे ‘निर्दय बनो!’ हाच आजचा मंत्र आहे. एकच पक्ष, एकच नेता, त्याचा एकच उद्योगपती, एकच कायदा, एकच देव एकच भाषा, असं सगळं ‘एकी’करण झालं की, ते पूर्ण ‘निर्भय’ होतील. एकदा ते पूर्ण ‘निर्भय’ झाले की, जग ‘भयमुक्त’ झालंच समजा .......

बाबा आढाव : “भारतीय संविधानाची मोडतोड सुरू झाली आहे. त्यामुळे आता ‘संविधान बचावा’ची चळवळ सुरू झाली पाहिजे. डॉ. बाबासाहेबांनी तयार केलेल्या राज्यघटनेचं संरक्षण हा ‘राजकीय अजेंडा’ झाला पाहिजे.”

पंतप्रधानांच्या विरोधात बोलणं हा ‘देशद्रोह’ समजला जाऊ लागला आहे. या परिस्थितीतून पुढं काय निर्माण होईल, याचं विश्लेषण करत हात बांधून चूप बसण्याची ही वेळ नाही. चर्चा करण्याऐवजी काय निर्माण व्हायला हवं, यासाठी संघर्ष करण्याची वेळ आली आहे. यात जेवढे लोक पुढे येतील, त्यांना बरोबर घेऊन थेट संघर्ष सुरू करायला. हवा. प्रसंगी आपल्याला प्रस्थापित विचारवंत ‘वेडे’ म्हणतील, पण संघर्ष सुरू करायला हवा. गप्प बसण्याची ही वेळ नाही.......