कोण पुरोगामी, कोण धर्मनिरपेक्ष, अशा प्रश्नांना उत्तरे सापडणे तरी शक्य आहे का?
पडघम - देशकारण
देवेंद्र शिरुरकर
  • प्रकाश आंबेडकर, शरद पवार, काँग्रेस आणि एमआयएम
  • Sat , 22 September 2018
  • पडघम देशकारण प्रकाश आंबेडकर Prakash Ambedkar शरद पवार Sharad Pawar काँग्रेस Congress राष्ट्रवादी काँग्रेस NCP एमआयएम MIM शिवसेना Shivsena

‘कमरेचे सोडले अन् डोक्याला गुंडाळले’ की कोणाचेही हसूच होत असते. असे हास्यास्पद प्रकार भारतीय जनतेला येत्या वर्षभर तरी पहावयास मिळणार आहेत. या असल्या विनोदी अंकांची सुरुवात एव्हाना झालेली आहे. येत्या लोकसभा निवडणुकीला फारसा अवधी राहिलेला नाही. सर्वसामान्य जनतेला काय मतदानाच्या केवळ आठच दिवस अगोदर मतदान प्रक्रियेत गुंतायचे असते. पण राजकीय पक्षांना आणि संभाव्य नेत्यांना वर्ष, सव्वा वर्ष आधी उमेदवार व्हावेसे लागते.

थोडक्यात काय तर राजकीय पक्षांनी महानाट्याची तयारी सुरू केली आहे. या लोकसभेपूर्वी दोन-तीन राज्यांत विधानसभा लढती व्हावयाच्या आहेत; पण मुख्य भर हा लोकसभेवरच राहणार आहे. स्थानिक पातळीवर थेट संपर्क प्रस्थापित करण्यापासून ते घराघरांत प्रचारपत्रकांचा रतीब घालण्यापर्यंतची कामे सुरू केली जातील. ती नेहमीच्या पद्धतीने आणि गतीने होत राहतील. पण तत्पूर्वी राजकीय पक्षांकडून मैदानात उतरण्यापूर्वी जी सर्कस करण्यात येत आहे, त्याने येत्या काळात जनतेच्या नशिबी असे हास्याचे फवारे उडाल्याचे अनुभवण्यास मिळणार आहेत.

सत्ता मिळवण्यासाठी कालच्या प्रतिस्पर्ध्यांना मित्रयादीत समाविष्ट करून घेण्यासाठी ज्या शाब्दिक कवायती सुरू आहेत, त्यातून या संभाव्य नाट्यपंचकाची कल्पना रसिकांना आलेली आहे. सगळेच राजकीय पक्ष एका माळेचे मणी आहेत, सत्तेसाठी वखवखलेले आहेत, हे जनतेला पुरते ठाऊक आहे. पण तरीही सर्व राजकीय पक्षांकडून मूल्याधिष्ठित राजकारणाचा जो गाजावाजा केला जात आहे, त्याने होत असलेल्या करमणुकीचा लाभ त्याला गमवायचा नाही.

एखादा नेता ज्या विचारसरणीचा असतो, त्याच विचारसरणीचा त्याचा पक्ष असतो, हा सरळ साधा हिशेबही जनतेला उलटा करून शिकवला जात आहे. पक्षाचा संस्थापक प्रमुख आणि पक्ष यांची विचारसरणी वेगवेगळी कशी काय असते बुवा? प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या या विधानामुळे सार्वजनिक जीवनातील मूल्याधिष्ठित वाटचालीला नवाच आयाम मिळाला आहे.

.............................................................................................................................................

रविशकुमार या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

राजकीय पक्ष आणि मूल्याधिष्ठित राजकारण यांचा परस्परसंबंध नसतो, हे सर्वविदित आहे. ज्या क्षणी जो मुद्दा प्रकाशझोतात झळकावेल, ज्यामुळे चर्चा होत राहतील, जनमानसात पडसाद उमटतील असे मुद्दे उकरून काढत वाटचाल करण्याची राजकीय पक्षांची रीत जवळपास सर्वच राजकीय नेत्यांनी कमी-अधिक प्रमाणात वापरून झालेली आहे. आताही त्यात बदल झालेला नाही. हे सगळे मतदात्यांना ठाऊक नाही, असा गैरसमज कोणी करून घेऊ नये. ‘ये जो पब्लिक है, ये सब जानती है’ हे नेत्यांनाही ज्ञात असते. ते केवळ जनसमूहाच्या अल्पकाळच्या स्मृतीवर भरोसा ठेवून असतात. कधीकाळी एकमेकांना पाण्यात पाहणारे अखिलेश यादव आणि मायावती सत्तेसाठी ‘तुझ्या गळा माझ्या गळा गुंफू मोत्यांच्या माळा’ म्हणत एकत्र येतात, हे एकच उदाहरण बोलके ठरावे.

राजकीय प्रवासादरम्यान ठेवायची लवचीकता हे एक तत्त्व म्हणून मान्य केले तरी जनाची नव्हे, तर मनाची म्हणून तरी काही पायाभूत तत्त्वं अबाधित राखली जाणे जनतेला अपेक्षित असते. पण एकदा निखळ सत्ताप्राप्ती हेच एकमेव ध्येय म्हणून स्वीकारले जाते, तेव्हा अशा लोकांसाठी कसलाच विधिनिषेध गम्य ठरत नाही. धर्मनिरपेक्ष, पुरोगामी मित्रांसोबत हातमिळवणीच्या हकाट्या पिटून सत्तेच्या पावसातले चार थेंब चाखण्याची क्षुधा केविलवाणी असते.

आता कोण पुरोगामी आहे, कोण धर्मनिरपेक्ष आहे अशा प्रश्नांना उत्तरे सापडणे तरी शक्य आहे का? रंग बदलण्यात सरड्यावर मात करणाऱ्या राजकीय आखाड्यात आपला मूळ रंग राखून असणारा सापडणे हे मृगजळाचा शोध घेण्यासारखे आहे. सतत सत्तेच्या छायेत वावरलेले शरद पवार धर्मनिरपेक्ष आणि त्यांचा राष्ट्रवादी मात्र धर्मांध कसा ठरतो? इथे प्रकाश आंबेडकरांना नेमके काय सुचवायचे आहे? ते एकाच वेळी एमआयएम आणि काँग्रेसला एकत्र येण्याची साद घालताहेत. ती साद कशासाठी, तर भाजप आणि शिवसेना यांना पर्याय म्हणून.

गत सहा महिन्यांत अशा काय घडामोडी घडल्या आहेत की, त्यांना शरद पवारांना व्यक्तिश: धर्मनिरपेक्ष असल्याचा आणि त्यांचा पक्ष तसा नसल्याचा साक्षात्कार झालेला आहे. बरे, भाजप आणि सेनेचा पाडाव करण्यासाठी जर ते धर्मनिरपेक्ष मित्रांना एकत्र आणत असतील, तर  एमआयएमला सोबत घेऊन कोणती धर्मनिरपेक्षता साधली जाणार आहे? प्रकाश आंबेडकरांना एमआयएम हा सेनेच्या पावलावर पाऊल ठेवून वाटचाल करणारा पक्ष कसा काय या महाआघाडीत चालू शकतो? सर्वांत महत्त्वाचे म्हणजे सर्वसमावेशक राजकारण करणाऱ्या काँग्रेसला अशा आघाडीत सहभागी व्हायचे आहे का, हा प्रश्नही महत्त्वाचा आहे. काँग्रेससाठी एमआयएम आणि सेना एकाच पारड्यातील साथीदार आहेत. म्हणजे किमान काँग्रेसच्या पारंपरिक मतदाराला तरी तसे वाटते.

शेतकऱ्यांचे प्रश्न, महागाई, बेरोजगारी हे जनतेसाठी संवेदनशील मुद्दे विरोधी पक्षांना निवडणुका जिंकण्यासाठी पुरेसे वाटत नाही, तोवर त्यांच्याकडून  ‘समविचारी’ या घासून गुळगुळीत संकल्पनेच्या आघाड्या उभारल्या जातील, पण विरोधकांच्या या कृतीमुळे सर्वसामान्य जनतेच्या मनातल्या मूल्याधिष्ठित राजकारणाच्या आशा-अपेक्षा मनातच जिरवल्या जात आहेत, हे दु:खद वास्तव आहे. त्याची चिंता येथे आहे तरी कोणाला? 

.............................................................................................................................................

लेखक देवेंद्र शिरुरकर मुक्त पत्रकार आहेत.

shirurkard@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’चे अँड्राईड अॅप डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा -

 

Post Comment

Manoj Patil

Sat , 22 September 2018

RAM JAGTAP, Why do you allow this kind of man to write on AKSHARNAMA ...... Kahihi lihito ha manus ........Read his view on SWARA BHASKAR and KEJRIWAL........ I think AKSHARNAMA has some fantastic writers Like PARIMAL, WAGLE, PAWAR...... Then What you guys need him for. And most irritating is he writes twice, thrice a week ........................ R u Kidding us................. (Reader Who at least visits once AKSHARNAMA)


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

आठवलेसाहेब, तुमच्या मोदींनी गेल्या दहा वर्षांत ‘किती वेळा’ राज्यघटनेचे ‘पालन’ केले आहे? आणि ‘किती वेळा’ अनुसूचित जातींना ‘न्याय’ दिला आहे?

मुळात संविधान बदलाच्या चर्चेची सुरुवात भाजप आणि संघाच्या जबाबदार पदाधिकाऱ्यांनीच केलेली आहे. ‘संविधान बदलासाठी चारशेपेक्षा जास्त जागा द्या’ अशी मागणी भाजपच्या एका वरिष्ठ खासदाराने केली होती. गेल्या वर्षी मोदीचे आर्थिक सल्लागार बिबेक देबरॉय यांनी एक लेख लिहून संविधान बदलण्याची गरज असल्याचं सांगितलं होतं. त्यामुळे विरोधक बाबासाहेबांचा अपमान करताहेत, हा आठवलेंचा आरोप म्हणजे शुद्ध लबाडी आहे.......

‘जातवास्तव’ स्वीकारल्याशिवाय सत्ता आणि संसाधनांचा जातीय ‘असमतोल’ दूर करता येणार नाही. उमेदवारांची नावे जातीसकट जाहीर करणे, हा एक ‘सकारात्मक प्रयोग’ आहे

महायुतीच्या ३८ उमेदवारांपैकी १९ मराठा आहेत. विशेष म्हणजे हे सगळे श्रीमंत मराठे आहेत. महाविकास आघाडीच्या ३९ उमेदवारांपैकी २४ मराठा आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या ३२ उमेदवारांपैकी ५ अनुसूचित जाती, १३ ओबीसी आणि ४ मराठा आहेत. यावरून एक गोष्ट लक्षात येते की, मविआ असो वा महायुती एका विशिष्ट समाजाकडेच सत्ताबळ झुकलेले दिसते. मात्र वंबआने उमेदवारी देताना जात समतोल पाळलेला दिसतो.......

स्वयंपाकघरात टांगलेल्या कॅलेंडरवरच्या चित्राइतकीच थरारकता वा जाहिरातीतून एखादं उत्साहवर्धक पेय विकणार्‍या म्हातार्‍या अमिताभ बच्चनइतकीच विश्वासार्हता, दहा वर्षं राष्ट्रीय व्यासपीठावर वावरलेल्या मोदींच्या व्यक्तिमत्त्वामध्ये उरली आहे...

प्रचारसभांमधून दिसणारे पंतप्रधान दमले-भागलेले, निष्प्रभ झालेले आहेत. प्रमाणापलीकडे वापरलेली छबी, अतिरिक्त भलामण आणि अतिश्रम, यांमुळे त्यांची ‘रया’ गेल्यासारखी वाटते. एखाद्या ‘टी-ट्वेंटी’ सामन्यात जसप्रीत बूमराला वीसच्या वीस षटकं गोलंदाजी करायला लावावी, तसं काहीसं हे झालेलं आहे. आक्रसत गेलेला मोदींचा ‘भक्तपंथ’ टिकून असला, तरी ‘करिष्मा’ उर्फ ‘जादू’ मात्र चाकोरीबद्ध झालेली आहे.......

भाजपच्या ७६ पानी ‘जाहीरनाम्या’त पंतप्रधान नरेंद्र मोदींची तब्बल ५३ छायाचित्रं आहेत. त्यामुळे हा जाहीरनामा आहे की, मोदींचा ‘छायाचित्र अल्बम’ आहे, असा प्रश्न पडतो

काँग्रेसच्या ४८ पानी जाहीरनाम्यात राहुल गांधींची फक्त पाच छायाचित्रं आहेत. त्यातली तीन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत आहेत. याउलट भाजपच्या जाहीरनाम्याच्या मुखपृष्ठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीमागे बळंच हसताहेत अशा स्वरूपाचं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचं छायाचित्र आहे. त्यातली ‘बिटवीन द लाईन’ खूप सूचक आणि स्पष्टता सूचित करणारी आहे.......

जर्मनीत २० हजार हत्तींचा कळप सोडण्याची धमकी एका देशाने दिली आहे, ही ‘हेडलाईन’ जगभरच्या प्रसारमाध्यमांमध्ये गाजतेय सध्या…

अफ्रिका खंडातील बोत्सवाना हा मुळात गरीब देश आहे. त्यातच एवढे हत्ती म्हणजे दुष्काळात तेरावा महिना. शेतांमध्ये येऊन हत्ती मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान करत असल्याने शेतकरी वैतागले आहेत. याची दखल बोत्सवानाचे अध्यक्ष मोक्ग्वेत्सी मेस्सी यांनी घेतली आहे. त्यामुळेच त्यांनी संतापून एक मोठी घोषणा केली आहे. ती म्हणजे तब्बल २० हजार हत्तींचा कळप थेट जर्मनीमध्ये पाठवण्याची. अनेक माध्यमांमध्ये ही ‘हेडलाईन’ गाजते आहे.......