आपले दु:ख कशात आहे हे पक्के ठाऊक असूनही जन ठायी ठायी का तुंबतो?
पडघम - देशकारण
देवेंद्र शिरुरकर
  • प्रातिनिधिक चित्र
  • Wed , 19 September 2018
  • पडघम देशकारण सत्ता राजकारण Politics

अपेक्षाभंगाचे दु:ख पचवण्याची एक अमाप शक्ती भारतीय जनमानसात वास्तव्य करून राहिली आहे. त्याशिवायच का गत अनेक दशकांपासून हा जनांचा प्रवाहो असा अखंडितपणे चालतो आहे? अतृप्ततेच्या, अपूर्णतेच्या रिंगणाचे अभेद्य कवच भेदण्यासाठी सतत एक रिंगण आखतो आहे. गेल्या दिवसांतल्या जखमांवर इतिहासप्रसिद्ध हळद भरून नव्या ठेचांसाठी सिद्ध होतो आहे. हीच व्यथा इथल्या प्रत्येकाची आणि प्रत्येकाचा समावेश असणाऱ्या जनसमूहाचीपण आहे. आज कसा का मावळेना पण उद्याचा दिवस आपला आहे या मनातल्या दुर्दम्य आकांक्षेसह तो वाटचाल करतो आहे. आजचा दिवस मावळलेल्या कालसारखाच होता का त्याहूनही अधिक बेसुरा हे ठरवण्याची त्याची पद्धत कोणती? हे मात्र त्याचे त्यालाच ठाऊक आहे. कधीतरी आपली पहाट उजाडेल अन आशा-अपेक्षांचे रूपांतर वास्तवात झालेले अनुभवता येईल. या दिवसाची वाट पाहण्याखेरीज आपल्या हाती काहीच नाही, अशी निराशा, हतबलता असणे स्वाभाविक असले तरी या विशाल जनसमूहाच्या मनात आणखीही बरेचसे साचलेले आहे सुप्तपणे. जे प्रकट होणे, अभिव्यक्त होणे दुर्मीळ, दुर्लभ आहे.

उष:कालाच्या प्रतीक्षेत असलेल्यांच्या नशिबी कितीही काळरात्री आल्या तरी ते आशेचा पाठलाग करणे सोडत नाहीत, ही खरोखरीच सुखावह बाब आहे. कारण हाच समष्टीचा स्थायीभाव आहे. कदाचित तोच चराचरसृष्टीचाही अलिखित संकेत असावा. या सगळ्यांत समूहाच्या सोशिकतेची, सहनशीलतेची दखल मात्र घ्यायलाच हवी. आपल्या जगण्यातले रडे विसरून आशा-अपेक्षांचे प्रतिबिंब प्रत्यक्षात उतरेल कधीतरी या अपेक्षेवर जनसामान्यांचा प्रवास सुरू आहे निरंतर. या आजवरच्या वाटचालीत त्याच्या पदरी किती सुखाचे अन् किती दु:खाचे क्षण आले याची गणती त्याची त्यालाच ठाऊक! पण तरीही तो चालतोच आहे त्याच्या नशिबी आलेले सगळे देहभोग भोगण्यासाठी, आपल्या आकांक्षांची पूर्तता होईल या आकांक्षेसह. पदरी अपेक्षाभंग आला तरी पुन्हा नव्या अपेक्षाभंगाचे खुल्या मनाने स्वागत करण्यासाठी. या सर्व प्रवासात त्याने निर्माण केलेली राजकीय चौकटही अशीच वाटचाल करत आलेली आहे. एक माणूस, एक व्यक्ती म्हणून जगण्यासाठी जे-जे हवे ते मिळवण्याची त्याची स्वत:ची धडपड सुरूच आहे कायम. पण त्यात अडसर नकोत अथवा ते दूर करण्यासाठी त्याने ही आवरणे रचली आहेत सभोवती.

.............................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

व्यक्ती व व्यक्तीसमूहाच्या कल्याणासाठी त्याने आपले भाऊबंद पाठवलेत या व्यवस्था संचलनाच्या चौकटीत. पण तिथेही आजवर त्याच्या पदरी केवळ घोर निराशाच का येत आहे? कधी त्याच्या दारिद्र्याचे निर्मूलन केले जाणार असल्याचा आभास निर्माण केला जातो, तर कधी त्याच्या पदरी स्वस्तात धान्य मिळणार असल्याच्या वावड्या उठवल्या जातात. कधी कोणी त्याची गरिबी हटवण्याची ग्वाही देत असतो, तर कधी कोणी त्याच्या नशिबात ‘अच्छे दिन’ आणणार असल्याचा देखावा करतो. हे सगळे आभास आहेत हे त्याला उमगलेलेही असते. हे देखावे गणपतीसमोर, गौराईसमोरच्या देखाव्यासारखेच असतात काही क्षण मनाला उभारी देणारे. त्याच्या स्वप्नांची आरास मांडली जाते प्रत्येक वेळी नव्याने. पण त्याच्या वेदनांचे मूळ मात्र काही केल्या सापडत नाही. कारण ते शोधायचे नसतेच मुळी कोणाला! त्याच्या आजारावर उपचार होताहेत, त्यासाठी सगळी यंत्रणा कामाला लागलेली आहे, हा आभास त्याच्या मनात निर्माण करून द्यावयाचा असतो सगळ्यांना. त्याच्या वेदना हेच तर राज्यकर्त्यांचे खेळते भांडवल असते. मग त्याही शासकाच्या आणि प्रशासनाच्या हिशेबानुसार बदलत जातात. ‘ज्याचे दुखणे त्यालाच ठाऊक’ हे जळजळीत सत्य नाकारून सत्तेच्या भुकेल्या लोकांकडून त्याच्या वेदनांचा असा खुल्लम खुल्ला बाजार मांडला जातो निर्लज्जपणे. 

बिचारा नागरिक त्याला मिळत असलेल्या रुपयांत आपले भागत नाही म्हणून तळमळत असतो. त्याची चूल ज्यावर पेटते त्या इंधनाचे, पेट्रोल, डिझेलचे भाव गगनाला भिडतात. त्याला मिळत असणारा रुपयाही आता परवडत नाही, ही त्याची व्यथा रुपया घसरूनही तो वधारला असे सांगणाऱ्यांना कधी कळतच नाही. त्याचेच प्रश्न, दु:ख आणि वेदना त्याच्याचसमोर अशा रीतीने पेश केल्या जातात की, त्यालाही प्रश्न पडतो स्वत:च्या सुखासीनतेबद्दल! इतर सगळे गतप्राण झालेले असताना तो जिवंत आहे, याचे समाधान साजरे करण्याचा सरकारचा सल्ला त्याला आवडतो अन् तो गुमान पुन्हा सगळं सहन करायला सज्ज होतो. राग येतो कधी कधी त्यालाही; पण तोवर फार उशीर झालेला असतो. कारण त्याच्यासमोर आणखी कोणीतरी झगझगीत, चकचकीत स्वप्नांचे, अपेक्षांचे नवे तोरण बांधून नाचवत येतो डोळ्यांसमोर. मग हा संतप्त जनसमूह पुन्हा शांत होतो आणि वाट पाहतो की, यावेळी तरी आपल्या भाळी निराशा येणार नाही म्हणून.

आपले दु:ख कशात आहे हे पक्के ठाऊक असूनही जन ठायी ठायी का तुंबतो? कारण त्याच्या तुंबण्यातच अनेकांचे हित सामावलेले असते. जनसामान्यांच्या स्वप्नांवर सत्तेचे संचित हाती असलेल्यांना मनसोक्त चरायला एवढे आवडायला लागते की, ही बाग आपली नव्हे याचाही विसर पडत जातो. त्याच्या स्वप्नांच्या आशेवर आपल्यातलेच अनेक जण अमाप सुखी झालेले त्याने अनुभवलेले असतेही. सत्तेच्या कैफात त्यांच्या भूमिका बदलतात, याचा प्रत्ययही त्याला पदोपदी येत असतो. या आशा-अपेक्षांचे गाठोडे मानगुटीवर घेऊन झालेली फसवणूक मुकाटपणे सोसत तो चालत राहतो पुन्हा नव्या अपेक्षाभंगाकडे. कारण त्याच्यासाठी सारेच गाव तोतयांचे असते.

.............................................................................................................................................

लेखक देवेंद्र शिरुरकर मुक्त पत्रकार आहेत.

shirurkard@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’चे अँड्राईड अॅप डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा -

 

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

भाजपच्या ७६ पानी ‘जाहीरनाम्या’त पंतप्रधान नरेंद्र मोदींची तब्बल ५३ छायाचित्रं आहेत. त्यामुळे हा जाहीरनामा आहे की, मोदींचा ‘छायाचित्र अल्बम’ आहे, असा प्रश्न पडतो

काँग्रेसच्या ४८ पानी जाहीरनाम्यात राहुल गांधींची फक्त पाच छायाचित्रं आहेत. त्यातली तीन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत आहेत. याउलट भाजपच्या जाहीरनाम्याच्या मुखपृष्ठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीमागे बळंच हसताहेत अशा स्वरूपाचं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचं छायाचित्र आहे. त्यातली ‘बिटवीन द लाईन’ खूप सूचक आणि स्पष्टता सूचित करणारी आहे.......

जर्मनीत २० हजार हत्तींचा कळप सोडण्याची धमकी एका देशाने दिली आहे, ही ‘हेडलाईन’ जगभरच्या प्रसारमाध्यमांमध्ये गाजतेय सध्या…

अफ्रिका खंडातील बोत्सवाना हा मुळात गरीब देश आहे. त्यातच एवढे हत्ती म्हणजे दुष्काळात तेरावा महिना. शेतांमध्ये येऊन हत्ती मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान करत असल्याने शेतकरी वैतागले आहेत. याची दखल बोत्सवानाचे अध्यक्ष मोक्ग्वेत्सी मेस्सी यांनी घेतली आहे. त्यामुळेच त्यांनी संतापून एक मोठी घोषणा केली आहे. ती म्हणजे तब्बल २० हजार हत्तींचा कळप थेट जर्मनीमध्ये पाठवण्याची. अनेक माध्यमांमध्ये ही ‘हेडलाईन’ गाजते आहे.......

महाराष्ट्राच्या राजकारणाचा हा ‘खेळखंडोबा’ असाच चालू राहू द्यायचा की, त्यावर ‘अक्सिर इलाज’ करायचा, याचा निर्णय घेण्याची एकमेव ‘निर्णायक’ वेळ आलेली आहे…

जनतेला आश्वासनांच्या, ‘फेक न्यूज’च्या आणि प्रस्थापित मीडिया व सोशल मीडियाद्वारे भ्रमित करूनही सत्ता मिळवता येते, राखता येते, हे गेल्या दहा वर्षांत भाजपने दाखवून दिले आहे. पूर्वी सत्ता राजकीय नेत्यांना भ्रष्ट करते, असे म्हटले जायचे, हल्ली सत्ता भ्रष्ट राजकीय नेत्यांना ‘अभय’ वरदान देण्याचा आणि एकाधिकारशाही प्रवृत्तीच्या राजकारण्यांना ‘सर्वशक्तिमान’ होण्याचा ‘सोपान’ ठरू लागली आहे.......