टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • नारायण राणे, मनोहर पर्रीकर, ट्रम्प समर्थक आणि अरविंद केजरीवाल
  • Tue , 29 November 2016
  • विनोदनामा Vinodnama टपल्या नारायण राणे Narayan Rane मनोहर पर्रीकर Manohar Parrikar अरविंद केजरीवाल Arvind Kejriwal

१. संरक्षण मंत्रीपदाचा कारभार स्वीकारल्यानंतर पहिल्यांदा संरक्षण खात्याच्या कार्यालयात गेलो, तेव्हा मी थरथरत होतो. पण, मी तेव्हा शूर असल्याचा आव आणत होतो : संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर.

फेणीच्या प्रदेशातून जाणाऱ्या माणसाने हातपाय थरथरत असताना शौर्याचा आव आणण्याचा प्रयत्न करण्याचे अर्थ किती वेगळे लागू शकले असते पर्रीकर. आता तुम्ही चांगलेच रुळलेले दिसता. आता तुम्ही कधी काय बोलून बसाल आणि कशाकशाचे खुलासे करत बसायला लागाल, या कल्पनेने लष्करी उच्चाधिकारी आणि प्रवक्ते थरथरत असतात म्हणे!

………………

२. काँग्रेसमध्ये वशिल्यावर पदं दिली जातात. सरकारविरुद्ध काँग्रेस आक्रमक नसून ठोस भूमिका घेण्यात कमी पडत आहे. काँग्रेसचे प्रदेश नेतृत्व गंभीर नाही. काँग्रेसमध्ये गुणवत्ता बघून पदं दिली जात नाहीत, असे टीकास्त्र काँग्रेसचेच ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी कोकणात स्वबळावर विजय प्राप्त केल्याबरोब्बर सोडले!  

दादानु, काँग्रेस राज्यात 'गुणवत्ते'नुसार पदे देण्याचा धोका का पत्करत नाही, याचा खुलासा तुमच्या याच वक्तव्यातून होतो, हे लक्षात आलं का? नगरपालिका निवडणुका जिंकल्यावर तुम्ही इतकं बोलता, आणखी मोठं यश मिळालं तर आणखी काय काय बोलाल, कराल, याचीच भीती वाटते हो त्यांना.

………………

३. मुंबईतील नागरिकांना मोदी यांचं भाषण ऐकता यावं, म्हणून भाजपतर्फे ‘मन की बात’, ‘चाय के साथ’ कार्यक्रमांचं आयोजन. एक खास बनावटीची छत्री, बसण्यासाठी आसनं, भाषण ऐकण्यासाठी ध्वनिक्षेपक आणि सोबत चहा अशा स्वरूपाचा हा उपक्रम मुंबई व उपनगरात ३२८ ठिकाणी राबवण्यात आला.

खुर्चीवाले, ध्वनीयंत्रणावाले आणि चहावाला यांना चेकने पैसे दिले की पेटीएमने, त्याचा खुलासा नाही बातमीत. की शाखाशाखांवर आधीच कॅशचा बंदोबस्त करून ठेवला होता? बँकांपुढच्या रांगांची स्थिती सुधारली नाही, तर पुढचा कार्यक्रम मन की बात, चाय-नाश्ता-दोपहर के भोजन के साथ असं स्वरूप करायला लागेल कार्यक्रमाचं!

………………

४. अमेरिकेत पेनसिल्वेनियाकडे निघालेल्या विमानात नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकाचा गोंधळ; या तरुणाने आसनांमधल्या जागेत उभे राहून हिलरी क्लिंटन यांच्या समर्थकांचा अवमान करणारा आरडाओरडा केला. त्याच्यावर कारवाई न केल्याबद्दल विमान कंपनीनं माफी मागितली आहे. 

चला, आता आंतरराष्ट्रीय पातळीवरही 'भक्त'संप्रदाय मनोरंजनासाठी सज्ज झाला आहे तर. यांच्यापुढे आता हळूहळू खुद्द ट्रम्पतात्या मवाळ वाटू लागतील.

………………

५. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजपचे खासदार महेश शर्मा यांच्या मुलीच्या लग्नावरून ट्विटरवर त्यांची टर उडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, केजरीवाल यांनी लग्नाचे बिनचूक तपशील न घेता आरोप केल्यामुळे आणि शर्मा यांनी लग्नाचा खर्च धनादेशाद्वारे केला जात असल्याचं सांगितल्यामुळे केजरीवाल तोंडघशी पडले.

आरोपासाठी आरोप करत बसणं हे एकवेळ राजकारणाचा भाग म्हणून मान्य करता येऊ शकतं; पण, एका महत्त्वाच्या राज्याच्या जबाबदार मुख्यमंत्र्याने साधी माहिती न घेता काहीही आरोप करणं, हे त्या पदाची शोभा घालवणारं आहे. इतरांना सच्छिलतेचे धडे देणाऱ्यांनी तरी या चुका करून जोकर बनून करता कामा नये.

editor@aksharnama.com

Post Comment

Nilesh Pashte

Tue , 29 November 2016

केजरीवालांना आवरारे कुणीतरी !! :-) :-)


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण पंधरावे - ‘देश धोक्यात आहे’, असे हिंदुत्ववादी आणि लिबरल दोघांनाही वाटत होते. हिंदुत्ववाद्यांना वाटत होते, मुसलमानांकडून धोका आहे; लिबरल्सना वाटत होते, फॅसिस्ट शक्तींकडून...

२०१४पासून धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह अनेक मतदारांना पडला, हे नाकारता येणार नाही. हे घडून आले, याचे कारण भारताला गांधीजींच्या धर्मभावनेवर आधारलेल्या राजकारणाच्या विचारांचा विसर पडला होता, हे असेल का, असा विचार अनेकांच्या मनात तरळून जाऊ लागला. ‘लिबरल विचारवंत’ स्वतःशी म्हणत होते की, भारतीय जनतेला पडलेला धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह हे फक्त इतिहासाचे एक छोटेसे आवर्तन आहे.......

बंद करा ‘निर्भय बनो!, या राष्ट्राची ‘भयमुक्ती’च्या दिशेनं इतकी वेगानं वाटचाल चालू असताना, तुम्ही पण ‘निर्भय’ व्हा की! ‘राष्ट्रीय प्रवाहा’त सामील व्हा! बंद करा, तुमचं ते ‘निर्भय बनो’!

पोलीस शांत बसणार किंवा मदत करणार, याची खात्री असेल तरच ‘निर्भय’ता येणारच ना? निःशस्त्र सामान्य माणसं-मुलं मारणं, शत्रूच्या स्त्रियांवर बलात्कार करणं, हे शौर्यच आहे. म्हणजे ‘निर्दय बनो!’ हाच आजचा मंत्र आहे. एकच पक्ष, एकच नेता, त्याचा एकच उद्योगपती, एकच कायदा, एकच देव एकच भाषा, असं सगळं ‘एकी’करण झालं की, ते पूर्ण ‘निर्भय’ होतील. एकदा ते पूर्ण ‘निर्भय’ झाले की, जग ‘भयमुक्त’ झालंच समजा .......

बाबा आढाव : “भारतीय संविधानाची मोडतोड सुरू झाली आहे. त्यामुळे आता ‘संविधान बचावा’ची चळवळ सुरू झाली पाहिजे. डॉ. बाबासाहेबांनी तयार केलेल्या राज्यघटनेचं संरक्षण हा ‘राजकीय अजेंडा’ झाला पाहिजे.”

पंतप्रधानांच्या विरोधात बोलणं हा ‘देशद्रोह’ समजला जाऊ लागला आहे. या परिस्थितीतून पुढं काय निर्माण होईल, याचं विश्लेषण करत हात बांधून चूप बसण्याची ही वेळ नाही. चर्चा करण्याऐवजी काय निर्माण व्हायला हवं, यासाठी संघर्ष करण्याची वेळ आली आहे. यात जेवढे लोक पुढे येतील, त्यांना बरोबर घेऊन थेट संघर्ष सुरू करायला. हवा. प्रसंगी आपल्याला प्रस्थापित विचारवंत ‘वेडे’ म्हणतील, पण संघर्ष सुरू करायला हवा. गप्प बसण्याची ही वेळ नाही.......