टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • सायरस मिस्त्री, रावसाहेब दानवे, अमर्त्य सेन, जुन्या पाचशेच्या नोटा आणि सनी लिओनी
  • Mon , 28 November 2016
  • विनोदनामा Vinodnama टपल्या अमर्त्य सेन Amartya Sen सायरस मिस्त्री Cyrus Mistry रावसाहेब दानवे Raosaheb Danve सनी लिओनी Sunny Leone

१. टाटा स्टील कंपनीच्या अध्यक्षपदावरून हटवण्यात आलेल्या सायरस मिस्त्रींनी शनिवारी शनी शिंगणापूरला जाऊन शनीला अभिषेक करून पूजा केली. त्यांनी शिर्डीला जाऊन साईबाबांचे दर्शनदेखील घेतले.

अ मॅन इज नोन बाय हिज कंपनी म्हणजे माणूस त्याच्या सोबतीला कोणता मित्रपरिवार आहे, त्यावरून ओळखला जातो, म्हणतात. त्याचप्रमाणे तो कोणत्या दैवतांची जाहीरपणे पूजाअर्चा करतो, कोणत्या देवस्थानांना भेटी देतो, त्यावरूनही ओळखता येतो, सायरसभाऊ!

……………………………………

२. अमेरिकेची पॉर्न इंडस्ट्री 'गाजवून' बॉलिवूडमध्ये हॉट अभिनेत्री अशी ओळख कमावलेल्या सनी लिओनीने चाहत्यांपर्यंत थेट पोहोचण्यासाठी अॅप काढण्याचा निर्णय केला आहे.

सनीताई सनीताई (प्रस्तुत टपल्याकाराची पत्नी हा कॉलम वाचते, हे विचक्षण वाचकांच्या लक्षात आलं असणार), आता तुम्ही कसा सर्व्हे घेणार ते आम्हाला माहिती आहे… तुम्ही प्रश्न विचारणार, सनी लिओनी किती हॉट आहे?

उत्तराचे पर्याय - अ) हॉटेस्ट, ब) सुपरहॉट, क) खूपच हॉट, ड) अतिशय हॉट

……………………………………

३. केंद्र आणि राज्याच्या तिजोरीला कमळाचे कुलूप आहे. त्यामुळे त्या कुलुपाला अन्य पक्षाची चावी लागल्याने ते उघडणार नाही; पालिका निवडणुकीत भाजपचे नगराध्यक्ष व उमेदवार निवडून न दिल्यास विकास रोखू अशी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची गर्भित धमकी.

तात्या, तिजोरीच्या मालकापुढे कुलूपाने टणाटणा उड्या मारणं विनोदी आहे. मालकाने चावी बदलली आणि कुलुपाने हुशाऱ्या केल्या तर मालक कुलूप उचकटून फेकून देतो आणि नवं कुलूप बसवतो, हे लक्षात ठेवलंत तर पाकळी पाकळीने गळण्यापासून वाचाल.

……………………………………

४. तुमच्याकडे असणाऱ्या चलनाला काहीही किंमत उरलेली नाही, हे जनतेला अचानकपणे सांगणे, हे हुकूमशाहीचे अधिक जटील स्वरूप आहे. देशातील काळा पैसा बाहेर काढण्यासाठी नोटाबंदीचा निर्णय घेतल्याचा दावा सरकारकडून करण्यात येतो. मात्र, या एका कृतीमुळे सर्व भारतीय जनतेला किंवा भारतीय चलन असणाऱ्या प्रत्येकाकडे संशयितपणे बघितले जात आहे. आपल्याकडे काळा पैसा नसल्याचे किंवा आपण लबाड नसल्याचे त्यांना सिद्ध करावे लागत आहे. : नोबेल पुरस्कारविजेते भारतरत्न अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन.

कोण आहेत हे सेन? सुष्मिता किंवा कोंकोणा सेनचे कोणी नातेवाईक आहेत का? इतकी बडबड करायला ते राजीव दीक्षित किंवा सुब्रम्हण्यम स्वामी किंवा गेलाबाजार अरुण जेटली किंवा ऊर्जित पटेलांपेक्षा हुशार आहेत का? खांग्रेसच्या राजवटीतच त्यांना नोबेल पुरस्कार मिळालाय ना? तो त्यांनी अजून परत कसा केला नाही? काय कळतं त्यांना अर्थशास्त्रातलं? गेली ६० वर्षं ते का गप्प होते?

……………………………………

५. नोटाबंदीमुळे अंडरवर्ल्डचा बाजार उठला, मटका, शस्त्रतस्करी, खुनाची सुपारी, अंमली पदार्थांची तस्करी, हवाला व्यापार, वगैरे सगळ्या गुन्ह्यांना पायबंद बसला : आघाडीच्या वर्तमानपत्रातली बातमी.

एवढा मोठा फटका बसल्यानंतर आपण तपशीलवार माहितीच्या, आकड्यांच्या, तुलनात्मक तक्त्यांच्या अपेक्षेने बातमी वाचत पुढे जावं तर तिसऱ्या परिच्छेदात मुंबईतल्या 'एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर' ही माहिती दिल्याचं समजतं… यापुढे लोकलमधून प्रवास करताना कोणाशी नोटाबंदीचे लाभ या विषयावर चर्चा केल्यावर आपलं अर्थशास्त्राची जुनी गाइडं विकण्याचा धंदा आहे, हे सांगू नका… नेमका तोच बातमीदार निघायचा आणि 'एका अर्थतज्ज्ञाने नाव न सांगण्याच्या अटीवर' माहिती दिली, म्हणून तुमचं म्हणणं परिच्छेदात तोडून बातमी म्हणून छापून आणायचा.

editor@aksharnama.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण पंधरावे - ‘देश धोक्यात आहे’, असे हिंदुत्ववादी आणि लिबरल दोघांनाही वाटत होते. हिंदुत्ववाद्यांना वाटत होते, मुसलमानांकडून धोका आहे; लिबरल्सना वाटत होते, फॅसिस्ट शक्तींकडून...

२०१४पासून धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह अनेक मतदारांना पडला, हे नाकारता येणार नाही. हे घडून आले, याचे कारण भारताला गांधीजींच्या धर्मभावनेवर आधारलेल्या राजकारणाच्या विचारांचा विसर पडला होता, हे असेल का, असा विचार अनेकांच्या मनात तरळून जाऊ लागला. ‘लिबरल विचारवंत’ स्वतःशी म्हणत होते की, भारतीय जनतेला पडलेला धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह हे फक्त इतिहासाचे एक छोटेसे आवर्तन आहे.......

बंद करा ‘निर्भय बनो!, या राष्ट्राची ‘भयमुक्ती’च्या दिशेनं इतकी वेगानं वाटचाल चालू असताना, तुम्ही पण ‘निर्भय’ व्हा की! ‘राष्ट्रीय प्रवाहा’त सामील व्हा! बंद करा, तुमचं ते ‘निर्भय बनो’!

पोलीस शांत बसणार किंवा मदत करणार, याची खात्री असेल तरच ‘निर्भय’ता येणारच ना? निःशस्त्र सामान्य माणसं-मुलं मारणं, शत्रूच्या स्त्रियांवर बलात्कार करणं, हे शौर्यच आहे. म्हणजे ‘निर्दय बनो!’ हाच आजचा मंत्र आहे. एकच पक्ष, एकच नेता, त्याचा एकच उद्योगपती, एकच कायदा, एकच देव एकच भाषा, असं सगळं ‘एकी’करण झालं की, ते पूर्ण ‘निर्भय’ होतील. एकदा ते पूर्ण ‘निर्भय’ झाले की, जग ‘भयमुक्त’ झालंच समजा .......

बाबा आढाव : “भारतीय संविधानाची मोडतोड सुरू झाली आहे. त्यामुळे आता ‘संविधान बचावा’ची चळवळ सुरू झाली पाहिजे. डॉ. बाबासाहेबांनी तयार केलेल्या राज्यघटनेचं संरक्षण हा ‘राजकीय अजेंडा’ झाला पाहिजे.”

पंतप्रधानांच्या विरोधात बोलणं हा ‘देशद्रोह’ समजला जाऊ लागला आहे. या परिस्थितीतून पुढं काय निर्माण होईल, याचं विश्लेषण करत हात बांधून चूप बसण्याची ही वेळ नाही. चर्चा करण्याऐवजी काय निर्माण व्हायला हवं, यासाठी संघर्ष करण्याची वेळ आली आहे. यात जेवढे लोक पुढे येतील, त्यांना बरोबर घेऊन थेट संघर्ष सुरू करायला. हवा. प्रसंगी आपल्याला प्रस्थापित विचारवंत ‘वेडे’ म्हणतील, पण संघर्ष सुरू करायला हवा. गप्प बसण्याची ही वेळ नाही.......

प्रभा अत्रे : वंदे गानप्रभा स्वरयोगिनी, नादरूप अनूप बखानी । स्वर लय ताल सरस कहाई, रागरूप बहुरूप दिखायी, कलाविद्या सकल गुण ग्यानी, सृजन कहन सब ही जग मानी।

ललितरचनांमधला प्रभाताईंचा मुलायम तरल आवाज अंत:करणात रुतून बसे. मंद्र अथवा तार सप्तकात कुठेही सहजपणे वावरणारा, त्यांचा भावार्त सूर त्या काव्याचा अर्थ ऐकणाऱ्याच्या थेट काळजाला भिडवे. विचारांच्या बैठकीमुळे येणारा गहिरेपणा, संवेदनशील दर्दभरा आवाज आणि त्यातलं ओथंबलेलं रसिलेपण... प्रभाताईंची सरगम हा तर रसिकांना खास तृप्त करणारा आविष्कार. सरगमला खऱ्या अर्थानं त्यांनी संगीतजगतात प्रतिष्ठा मिळवून दिली .......