टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • सी. चंद्रशेखर राव, बाबूल सुप्रियो, किशोर बियाणी, पृथ्वीराज चव्हाण आणि केजरीवाल
  • Thu , 24 November 2016
  • विनोदनामा Vinodnama टपल्या पृथ्वीराज चव्हाण Prithviraj Chavan नरेंद्र मोदी Narendra Modi अरविंद केजरीवाल Arvind Kejriwal

१. नोटाबंदीमुळे काळा पैसा बाहेर आल्याचं मोदींनी सिद्ध केलं तर मोदींसाठी जोरजोराने टाळ्या वाजवेन, रस्त्याकडेला उभे राहून मोदी, मोदी असं ओरडेन : अरविंद केजरीवाल

केजरीवाल, आता तरी काहीतरी वेगळं करा. आताही तुम्ही सदासर्वकाळ तेच करत असता. लोकांना फरक कळणार कसा? निदान थोडा गॅप तरी ठेवा.

……………………………………

२. पंतप्रधान नरेंद्र मोदी नोटाबंदीविषयक गदारोळाला उत्तर द्यायला संसदेत का हजर राहत नाहीत, या विरोधकांच्या प्रश्नाची खिल्ली उडवताना केंद्रीय नगरविकास राज्यमंत्री बाबूल सुप्रियो म्हणाले की, जब छोटे बच्चे ही इनका जवाब दे सकते है, तो ‘डॅडी’ को आने की क्या जरूरत है?

बाबूल बेटा, डॅडी मोठे तुमच्यासाठी? लोकशाहीत संसद सर्वोच्च आहे. तिथे ‘मेरे डॅडी शक्तिमान’ म्हणून कडक्या पोरांनी बेडक्या फुगवत नाचायचं नसतं. डॅडींनी येऊन जबाबदारीने उत्तरं द्यायची असतात. डॅडींनी थेट इथं आणण्याआधी चांगल्या शाळेत घातलं असतं तर बरं झालं असतं बच्चेकंपनीला.

……………………………………

३. आता एटीएमबरोबरच ‘बिग बझार’च्या आस्थापनांमध्ये डेबिट कार्ड स्वाईप करून पैसे काढता येणार. दोन हजार रूपयांची मर्यादा : बिग बाझार समूहाचे अध्यक्ष किशोर बियाणी यांचं ट्वीट.

या वेगाने आणखी काही दिवसांत स्वायपिंग मशीन असलेल्या सगळ्याच आस्थापनांमध्ये ही व्यवस्था करावी लागेल. सहकारी बँका मात्र रिझर्व्ह बँकेच्या लेखी बिग बाजारइतक्याही विश्वासार्ह नाहीत, हे मनोज्ञ आहे.

……………………………………

४. सातारची स्वाभिमानी जनता आता ‘बारामती’चा आदेश मानत नाही, हे काँग्रेसचे उमेदवार मोहनराव कदम यांच्या विजयावरून स्पष्ट झालं आहे : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण

बापरे, सातारची काँग्रेस स्वयंभू झाली की काय! यापुढे ती दिल्लीचे आदेश घेणार नाही? हे काय बोलताय ते मॅडमना कुणी कळवलं तर काय होईल बाबा?

……………………………………

५. आपण बारबाहेर, दारूच्या दुकानाबाहेर रांग लावतोच ना, तर मग देश प्रामाणिक बनवण्यासाठी बँकेबाहेर रांग लावण्यात अडचण काय? : मल्याळी सुपरस्टार मोहनलालच्या विधानावरून केरळात वादंग

फारच असहिष्णू आहेत बुवा हे मल्याळी लोक. मोहनलालगारू कोणत्या रांगेतून कोणत्या रांगेत आले असतील, याचा अंदाज घेऊन सोडून द्यायचं ना त्यांचं विधान. जाने दो, पियेला है, म्हणतात, ते उगाच का!

……………………………………

६. तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या नव्या आलिशान घरातील बाथरुमही बुलेटप्रूफ, एक लाख चौरस फुटापेक्षा मोठया घरात दोन बेडरुमही बुलेटप्रूफ, ५० सुरक्षारक्षकही तैनात, सुरक्षा अधिकाऱ्यांचीही २४ तास नजर.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रावांना रिक्वेस्ट करून एक बेडरूम मिळवायला हरकत नाही. एका राज्याचं निम्मं पोलिस दल जर एकाच माणसाच्या सुरक्षेसाठी नेमलं गेलं असेल, तर तिथं त्यांना 'जान का खतरा' असण्याचा सवालच नाही.

editor@aksharnama.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण पंधरावे - ‘देश धोक्यात आहे’, असे हिंदुत्ववादी आणि लिबरल दोघांनाही वाटत होते. हिंदुत्ववाद्यांना वाटत होते, मुसलमानांकडून धोका आहे; लिबरल्सना वाटत होते, फॅसिस्ट शक्तींकडून...

२०१४पासून धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह अनेक मतदारांना पडला, हे नाकारता येणार नाही. हे घडून आले, याचे कारण भारताला गांधीजींच्या धर्मभावनेवर आधारलेल्या राजकारणाच्या विचारांचा विसर पडला होता, हे असेल का, असा विचार अनेकांच्या मनात तरळून जाऊ लागला. ‘लिबरल विचारवंत’ स्वतःशी म्हणत होते की, भारतीय जनतेला पडलेला धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह हे फक्त इतिहासाचे एक छोटेसे आवर्तन आहे.......

बंद करा ‘निर्भय बनो!, या राष्ट्राची ‘भयमुक्ती’च्या दिशेनं इतकी वेगानं वाटचाल चालू असताना, तुम्ही पण ‘निर्भय’ व्हा की! ‘राष्ट्रीय प्रवाहा’त सामील व्हा! बंद करा, तुमचं ते ‘निर्भय बनो’!

पोलीस शांत बसणार किंवा मदत करणार, याची खात्री असेल तरच ‘निर्भय’ता येणारच ना? निःशस्त्र सामान्य माणसं-मुलं मारणं, शत्रूच्या स्त्रियांवर बलात्कार करणं, हे शौर्यच आहे. म्हणजे ‘निर्दय बनो!’ हाच आजचा मंत्र आहे. एकच पक्ष, एकच नेता, त्याचा एकच उद्योगपती, एकच कायदा, एकच देव एकच भाषा, असं सगळं ‘एकी’करण झालं की, ते पूर्ण ‘निर्भय’ होतील. एकदा ते पूर्ण ‘निर्भय’ झाले की, जग ‘भयमुक्त’ झालंच समजा .......

बाबा आढाव : “भारतीय संविधानाची मोडतोड सुरू झाली आहे. त्यामुळे आता ‘संविधान बचावा’ची चळवळ सुरू झाली पाहिजे. डॉ. बाबासाहेबांनी तयार केलेल्या राज्यघटनेचं संरक्षण हा ‘राजकीय अजेंडा’ झाला पाहिजे.”

पंतप्रधानांच्या विरोधात बोलणं हा ‘देशद्रोह’ समजला जाऊ लागला आहे. या परिस्थितीतून पुढं काय निर्माण होईल, याचं विश्लेषण करत हात बांधून चूप बसण्याची ही वेळ नाही. चर्चा करण्याऐवजी काय निर्माण व्हायला हवं, यासाठी संघर्ष करण्याची वेळ आली आहे. यात जेवढे लोक पुढे येतील, त्यांना बरोबर घेऊन थेट संघर्ष सुरू करायला. हवा. प्रसंगी आपल्याला प्रस्थापित विचारवंत ‘वेडे’ म्हणतील, पण संघर्ष सुरू करायला हवा. गप्प बसण्याची ही वेळ नाही.......