टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • प्रणब मुखर्जी, देवेंद्र फडणवीस, अनिल कुंबळे, अडाणी-अंबानी आणि उद्धव ठाकरे
  • Fri , 18 November 2016
  • विनोदनामा Vinodnama टपल्या अडाणी अंबानी Adani Ambani देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis प्रणब मुखर्जी Pranab Mukherjee

१. नोटबदलाबद्दल अडाणी-अंबानी यांना आधीपासून माहिती होतं : भाजप आमदाराचा आरोप

कुछ नयी बात करो… हे आम्हाला आधीपासून माहिती नसेल का? अहो, सगळी त्यांचीच दुकानं आहेत, तर तुमचं काही वेगळं असेल का? सगळ्या दुकानांत माल एकच, फक्त पाट्या वेगवेगळ्या!

...............

२. मॅच निर्विघ्न पार पडावी, यासाठी कुंबळेच्या उपस्थितीत पिचची पूजा; त्यात गैर काय, कोहलीचा सवाल

आता आयपीएलमध्ये तरी त्या चीअरगर्ल्सच्या शेजारी वेगळा प्लॅटफॉर्म उभारून त्यावर 'चीअरभटजी' बसवा आणि दोन्ही टीम्सच्या वतीने जोरदार होमहवन चालूद्यात. एखादा गडी बाद होऊ नये म्हणून देव पाण्यात बुडवून ठेवायचे, मृत्युंजय मंत्राचा जाप करायचा. तेही वेगळ्या प्रकारचं लोकप्रिय मनोरंजन ठरेल. कोहली वगैरे मंडळींना कद नेसून पाठवा बॅटिंगला आणि रात्री जी टीम जिंकेल, तिने सत्यनारायणाची पूजा घालायची!

...............

३. ५० दिवस त्रास सहन करणं, हीच खरी देशभक्ती : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अडीच वर्षांच्या अनुभवानंतर आता एक दुरुस्ती करायला हरकत नाही… तुमच्या देशभक्तीच्या भंपक, सोयीस्कर आणि स्वस्त कल्पना सहन करणं, हे बँकांबाहेरच्या रांगेत उभे राहण्याच्या त्रासापेक्षा असह्य काम आहे… त्या सहन करत राहणं, हीच खरी देशभक्ती मानायला हवी.

...............

४. मोदी सरकारचा मोहम्मदी कारभार, १२५ कोटी जनतेला त्रास देणं हा राष्ट्रीय अपराध, जनतेच्या आक्रोशाचे लाउडस्पीकर होणारे बाळासाहेब हवे होते : उद्धव ठाकरे

अजूनही तेच हवे होते? तुम्ही कशाला आहात मग? तुम्हाला कशाला नेमून गेलेत ते? तुम्ही एकीकडे मोहम्मदाच्या डीजेवर नाच करणार आणि वर आमचा लाऊडस्पीकर हरपला, म्हणून रडूनही दाखवणार? यापेक्षा लाऊडस्पीकर हरपल्याबरोब्बर आपला ब्रास बँड बंद करून टाकायचा होता ना!

...............

५. नव्या निर्णयानुसार आता नागरिकांना लग्नकार्यासाठी बँक खात्यातून अडीच लाखांची रक्कम काढता येणार आहे.

भूक लागली? लग्न करा! घटस्फोटांसाठीही रक्कम काढण्याची तरतूद करून टाका लगेहाथ. म्हणजे विवाहित लोक घटस्फोट घेऊन परत लग्न करतील… देशासाठी लग्न करण्याची अशी सुवर्णसंधी परत मिळणार आहे का दुसरी?

...............

६. गेल्या वर्षी देशभरात केवळ एक लाख ३५ हजार रोजगारांची निर्मिती झाली. सात वर्षांतील हा नीचांक आहे. हे चित्र कायम राहिल्यास देश महासंकटाच्या खाईत जाईल : राष्ट्रपती प्रणब मुखर्जी

राष्ट्रपती महोदय, फेसबुक आणि व्हॉट्सअॅपवरचे मजूर मोजले नसणार तुम्ही. त्यांना पगार मिळत नसला म्हणून काय झालं; हाताला काम तर आहे ना!

editor@aksharnama.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण पंधरावे - ‘देश धोक्यात आहे’, असे हिंदुत्ववादी आणि लिबरल दोघांनाही वाटत होते. हिंदुत्ववाद्यांना वाटत होते, मुसलमानांकडून धोका आहे; लिबरल्सना वाटत होते, फॅसिस्ट शक्तींकडून...

२०१४पासून धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह अनेक मतदारांना पडला, हे नाकारता येणार नाही. हे घडून आले, याचे कारण भारताला गांधीजींच्या धर्मभावनेवर आधारलेल्या राजकारणाच्या विचारांचा विसर पडला होता, हे असेल का, असा विचार अनेकांच्या मनात तरळून जाऊ लागला. ‘लिबरल विचारवंत’ स्वतःशी म्हणत होते की, भारतीय जनतेला पडलेला धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह हे फक्त इतिहासाचे एक छोटेसे आवर्तन आहे.......

बंद करा ‘निर्भय बनो!, या राष्ट्राची ‘भयमुक्ती’च्या दिशेनं इतकी वेगानं वाटचाल चालू असताना, तुम्ही पण ‘निर्भय’ व्हा की! ‘राष्ट्रीय प्रवाहा’त सामील व्हा! बंद करा, तुमचं ते ‘निर्भय बनो’!

पोलीस शांत बसणार किंवा मदत करणार, याची खात्री असेल तरच ‘निर्भय’ता येणारच ना? निःशस्त्र सामान्य माणसं-मुलं मारणं, शत्रूच्या स्त्रियांवर बलात्कार करणं, हे शौर्यच आहे. म्हणजे ‘निर्दय बनो!’ हाच आजचा मंत्र आहे. एकच पक्ष, एकच नेता, त्याचा एकच उद्योगपती, एकच कायदा, एकच देव एकच भाषा, असं सगळं ‘एकी’करण झालं की, ते पूर्ण ‘निर्भय’ होतील. एकदा ते पूर्ण ‘निर्भय’ झाले की, जग ‘भयमुक्त’ झालंच समजा .......

बाबा आढाव : “भारतीय संविधानाची मोडतोड सुरू झाली आहे. त्यामुळे आता ‘संविधान बचावा’ची चळवळ सुरू झाली पाहिजे. डॉ. बाबासाहेबांनी तयार केलेल्या राज्यघटनेचं संरक्षण हा ‘राजकीय अजेंडा’ झाला पाहिजे.”

पंतप्रधानांच्या विरोधात बोलणं हा ‘देशद्रोह’ समजला जाऊ लागला आहे. या परिस्थितीतून पुढं काय निर्माण होईल, याचं विश्लेषण करत हात बांधून चूप बसण्याची ही वेळ नाही. चर्चा करण्याऐवजी काय निर्माण व्हायला हवं, यासाठी संघर्ष करण्याची वेळ आली आहे. यात जेवढे लोक पुढे येतील, त्यांना बरोबर घेऊन थेट संघर्ष सुरू करायला. हवा. प्रसंगी आपल्याला प्रस्थापित विचारवंत ‘वेडे’ म्हणतील, पण संघर्ष सुरू करायला हवा. गप्प बसण्याची ही वेळ नाही.......