टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • पंतप्रधान मोदी, अरुण जेटली, अमित शहा, राहुल गांधी आणि मीठ खरेदी करणारे भारतीय
  • Mon , 14 November 2016
  • टपल्या टिक्कोजीराव Taplya Tikkojirao Humour विनोदनामा

१. पाचशे-हजाराच्या नोटा रद्द करण्याच्या निर्णयाने काळाबाजार करणारे, करचोरी करणारे आणि भ्रष्ट मार्गाने संपत्ती जमवलेल्यांना त्रास होणारच. पण तुम्ही (राहुल गांधी, अरविंद केजरीवाल, मुलायमसिंह यादव) त्यास का विरोध करत आहात,  तुम्ही काळ्या पैशाच्या बाजूने आहात की विरोधात, दहशतवादी कारवायांना होणाऱ्या वित्तपुरवठ्याच्या विरोधात आहात की बाजूने, याबाबत तुमची भूमिका एकदा स्पष्ट करा : अमित शाह

अमितुद्दीन मियाँ, जो नोटाबदलीचा टीकाकार तो काळ्या पैशाचा पुरस्कर्ता, ही आयडिया जो सरकारच्या विरोधात, तो देशद्रोही याइतकीच भंपक आहे. या तुघलकी पद्धतीने अंमलात आलेल्या निर्णयाच्या ‘सर्जिकल स्ट्राइक’ने काळा पैसावाल्यांच्या आधी देशातली हातावर पोट असणारी सामान्य जनता घायाळ झाली आहे. तिच्या वेदनेवर फुंकर घालता येत नसेल, तर मीठ तरी नका चोळू.

..........

२. देशभरात आता मीठटंचाईची अफवा, १४-१५ रुपये किलोचं मीठ दोनशे ते चारशे रुपये किलोनं विकत घेण्यासाठी गर्दी

या अफवा पसरवून मीठ विकणारे जुन्या चलनात नोटा स्वीकारत असतील काय? म्हणजे पाचशेची जुनी नोट तीसेक रुपयांत खिशात घालण्याचीच आयडिया. तिचं नव्या चलनात रूपांतर करायला आणखी दीड महिना आहेच. अहा रे काळ्या पैशांवरचा स्ट्राइक.

..........

३. राहुल गांधींनीही रांगेत उभं राहून नोटा बदलून घेतल्या, स्टंटबाजी केल्याची भाजपची टीका

यावर, म्हणजे ही स्टंटबाजी असल्यावर विश्वास ठेवणं कठीण जातंय, कारण, एकाही भाजप नेत्याने ती का बरं केली नाही? पंतप्रधान मोदी जपानहून परत येऊन दोन हजाराच्या नोटेसोबत सेल्फी कधी काढतायत, याची वाट पाहत असणार. त्यांच्याआधी सेल्फी काढला तर फाऊल धरत असतील ना पक्षात?

..........

४. नोटांच्या आकारानुसार तांत्रिक बदल करावे लागणार असल्याने एटीएम पूर्ववत व्हायला आणखी दोन ते तीन आठवडे लागतील : अर्थमंत्री अरुण जेटली

म्हणजे आणखी तीन आठवडे बँकांपुढे रांगा, मनुष्यतासांचा चुराडा, व्यापारात खोट, देशाच्या उलाढालीला ब्रेक. नोटा बदलण्यासाठी नव्या नोटा छापण्याची आणि जुन्या नष्ट करण्याची किंमत वेगळीच. या सगळ्याच्या टोटलइतका तरी काळा पैसा बाहेर येईल का या उपद्व्यापातून?

..........

५. काळ्या पैशावर ३० डिसेंबरनंतर आणखी एक सर्जिकल स्ट्राइक : पंतप्रधान नरेंद्र मोदी

काळापैसेवाले हसत असतील गालातल्या गालात. त्यांनी सगळी परम्युटेशन-कॉम्बिनेशन करून बांधबंदिस्ती करून टाकली असणार. आता ही बातमी वाचल्यावर धडकी भरणार ती हातावर पोट असलेल्या कष्टकऱ्यांना, छोट्या व्यापाऱ्यांना, नोकरदारांना आणि शेतकऱ्यांना. दिवाळीतला बाण कधीकधी उलटी बाटली कलंडून वेडावाकडा शिरतो वस्तीत, तसला प्रकार झाला हा!

editor@aksharnama.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण पंधरावे - ‘देश धोक्यात आहे’, असे हिंदुत्ववादी आणि लिबरल दोघांनाही वाटत होते. हिंदुत्ववाद्यांना वाटत होते, मुसलमानांकडून धोका आहे; लिबरल्सना वाटत होते, फॅसिस्ट शक्तींकडून...

२०१४पासून धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह अनेक मतदारांना पडला, हे नाकारता येणार नाही. हे घडून आले, याचे कारण भारताला गांधीजींच्या धर्मभावनेवर आधारलेल्या राजकारणाच्या विचारांचा विसर पडला होता, हे असेल का, असा विचार अनेकांच्या मनात तरळून जाऊ लागला. ‘लिबरल विचारवंत’ स्वतःशी म्हणत होते की, भारतीय जनतेला पडलेला धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह हे फक्त इतिहासाचे एक छोटेसे आवर्तन आहे.......

बंद करा ‘निर्भय बनो!, या राष्ट्राची ‘भयमुक्ती’च्या दिशेनं इतकी वेगानं वाटचाल चालू असताना, तुम्ही पण ‘निर्भय’ व्हा की! ‘राष्ट्रीय प्रवाहा’त सामील व्हा! बंद करा, तुमचं ते ‘निर्भय बनो’!

पोलीस शांत बसणार किंवा मदत करणार, याची खात्री असेल तरच ‘निर्भय’ता येणारच ना? निःशस्त्र सामान्य माणसं-मुलं मारणं, शत्रूच्या स्त्रियांवर बलात्कार करणं, हे शौर्यच आहे. म्हणजे ‘निर्दय बनो!’ हाच आजचा मंत्र आहे. एकच पक्ष, एकच नेता, त्याचा एकच उद्योगपती, एकच कायदा, एकच देव एकच भाषा, असं सगळं ‘एकी’करण झालं की, ते पूर्ण ‘निर्भय’ होतील. एकदा ते पूर्ण ‘निर्भय’ झाले की, जग ‘भयमुक्त’ झालंच समजा .......

बाबा आढाव : “भारतीय संविधानाची मोडतोड सुरू झाली आहे. त्यामुळे आता ‘संविधान बचावा’ची चळवळ सुरू झाली पाहिजे. डॉ. बाबासाहेबांनी तयार केलेल्या राज्यघटनेचं संरक्षण हा ‘राजकीय अजेंडा’ झाला पाहिजे.”

पंतप्रधानांच्या विरोधात बोलणं हा ‘देशद्रोह’ समजला जाऊ लागला आहे. या परिस्थितीतून पुढं काय निर्माण होईल, याचं विश्लेषण करत हात बांधून चूप बसण्याची ही वेळ नाही. चर्चा करण्याऐवजी काय निर्माण व्हायला हवं, यासाठी संघर्ष करण्याची वेळ आली आहे. यात जेवढे लोक पुढे येतील, त्यांना बरोबर घेऊन थेट संघर्ष सुरू करायला. हवा. प्रसंगी आपल्याला प्रस्थापित विचारवंत ‘वेडे’ म्हणतील, पण संघर्ष सुरू करायला हवा. गप्प बसण्याची ही वेळ नाही.......

प्रभा अत्रे : वंदे गानप्रभा स्वरयोगिनी, नादरूप अनूप बखानी । स्वर लय ताल सरस कहाई, रागरूप बहुरूप दिखायी, कलाविद्या सकल गुण ग्यानी, सृजन कहन सब ही जग मानी।

ललितरचनांमधला प्रभाताईंचा मुलायम तरल आवाज अंत:करणात रुतून बसे. मंद्र अथवा तार सप्तकात कुठेही सहजपणे वावरणारा, त्यांचा भावार्त सूर त्या काव्याचा अर्थ ऐकणाऱ्याच्या थेट काळजाला भिडवे. विचारांच्या बैठकीमुळे येणारा गहिरेपणा, संवेदनशील दर्दभरा आवाज आणि त्यातलं ओथंबलेलं रसिलेपण... प्रभाताईंची सरगम हा तर रसिकांना खास तृप्त करणारा आविष्कार. सरगमला खऱ्या अर्थानं त्यांनी संगीतजगतात प्रतिष्ठा मिळवून दिली .......