टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • मनोहर पर्रीकर, महेश शर्मा, उद्धव ठाकरे, राजनाथ सिंह आणि सीता आनंदम
  • Sat , 12 November 2016
  • टपल्या टिक्कोजीराव Taplya Tikkojirao

१. अण्वस्त्राचा प्रथम वापर न करण्याचं भारताचं धोरण आहे. पण, वेळ पडली तर भारतही प्रथम अण्वस्त्र वापरू शकतो : संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर

संरक्षणमंत्र्यांचं हे मत व्यक्तिगत आहे, संरक्षणखात्याचं हे मत नाही, असं स्पष्टीकरण त्या खात्याने दिलं आहे. आपल्याच खात्याकडून टपली खायची हौस तरी किती पर्रीकरांना! संरक्षण मुख्यालय नागपूरला हललेलं नाहीये नाना.

..........

२. अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी निवडणुकीत दिलेली आश्वासन पूर्ण केली नाहीत, तर अमेरिकी जनता त्यांच्या ५६ इंच छातीचे माप काढेल : शिवसेनेचा चिमटा

कुठूनही जाता जाता मोदी आणि भाजप यांचा मुखभंग करण्याची उबळ काही शिवसेना रोखू शकत नाही. पण, ट्रम्पतात्यांनी हा सल्ला मनावर घ्यायचं काही कारण नाही. शिवसेनेने मुंबईचा एवढा सत्यानाश केल्यानंतरही भूमिपुत्रवादाची भूल चढलेली भयभीत जनता इमानेइतबारे निवडून देतेच की शिवसेनेला.

..........

३. भारतात पतीकडून पत्नीवर बलात्कार, ही संकल्पनाच अस्तित्वात नाही; कारण लग्न हे पवित्र बंधन आहे : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या महिला शाखेच्या सचिव सीता आनंदम यांचं मत

काकू, परस्परआदरावर आणि समानतेच्या तत्त्वावर उभ्या असलेल्या या नात्यात जेव्हा एकतर्फी सुखाची जबरदस्ती होते, तेव्हाच या पवित्र बंधनाचं पावित्र्य नष्ट होतं आणि कायद्याच्या भाषेत त्याला बलात्कार म्हणतात. आणि हो, आपल्याकडे लग्न अजूनही कायदेशीर करारच आहे, बरं का!

..........

४. ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा न स्वीकारणाऱ्या रुग्णालयांत केंद्रीय पर्यटन मंत्री डॉ. महेश शर्मा यांच्या कैलाश रूग्णालयाचाही समावेश.

‘दिव्याखाली अंधार आणि लोका सांगे ब्रम्हज्ञान’ यांसारख्या म्हणी अजरामर ठेवण्यात महेश शर्मांसारख्या महानुभावांचा मोठा वाटा आहे. अर्थात निर्लज्जाच्या बुडावर घातला पाला, गार लागतंय, अजून घाला, ही म्हणही तेच जिवंत ठेवतील, यात शंका नाही.

..........

५. ट्रम्प यांनी अमेरिकेत असं सांगितलं की मी अमेरिकेचा राष्ट्रपती बनलो, तर अमेरिकेत श्री. नरेंद्र मोदी यांच्या धोरणांनुसार काम करीन, त्यामुळेच ट्रम्प यांना विजय मिळाला : उत्तर प्रदेशातल्या सभेत राजनाथ सिंह

काही तांत्रिक अडचणी नसत्या आणि मोदी निवडणुकीला उभे राहू शकले असते, तर ते भारतात राहूनही निव्वळ थ्री डी प्रोजेक्शनच्या साह्याने अमेरिकन अध्यक्षपदाची निवडणूकही जिंकू शकले असते आणि त्यांनी व्हाइट हाऊसमधून चीन आणि रशिया यांचाही कारभार हाकला असता, यात मुळातच कुणाला काही संशय नाही.

editor@aksharnama.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण पंधरावे - ‘देश धोक्यात आहे’, असे हिंदुत्ववादी आणि लिबरल दोघांनाही वाटत होते. हिंदुत्ववाद्यांना वाटत होते, मुसलमानांकडून धोका आहे; लिबरल्सना वाटत होते, फॅसिस्ट शक्तींकडून...

२०१४पासून धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह अनेक मतदारांना पडला, हे नाकारता येणार नाही. हे घडून आले, याचे कारण भारताला गांधीजींच्या धर्मभावनेवर आधारलेल्या राजकारणाच्या विचारांचा विसर पडला होता, हे असेल का, असा विचार अनेकांच्या मनात तरळून जाऊ लागला. ‘लिबरल विचारवंत’ स्वतःशी म्हणत होते की, भारतीय जनतेला पडलेला धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह हे फक्त इतिहासाचे एक छोटेसे आवर्तन आहे.......

बंद करा ‘निर्भय बनो!, या राष्ट्राची ‘भयमुक्ती’च्या दिशेनं इतकी वेगानं वाटचाल चालू असताना, तुम्ही पण ‘निर्भय’ व्हा की! ‘राष्ट्रीय प्रवाहा’त सामील व्हा! बंद करा, तुमचं ते ‘निर्भय बनो’!

पोलीस शांत बसणार किंवा मदत करणार, याची खात्री असेल तरच ‘निर्भय’ता येणारच ना? निःशस्त्र सामान्य माणसं-मुलं मारणं, शत्रूच्या स्त्रियांवर बलात्कार करणं, हे शौर्यच आहे. म्हणजे ‘निर्दय बनो!’ हाच आजचा मंत्र आहे. एकच पक्ष, एकच नेता, त्याचा एकच उद्योगपती, एकच कायदा, एकच देव एकच भाषा, असं सगळं ‘एकी’करण झालं की, ते पूर्ण ‘निर्भय’ होतील. एकदा ते पूर्ण ‘निर्भय’ झाले की, जग ‘भयमुक्त’ झालंच समजा .......

बाबा आढाव : “भारतीय संविधानाची मोडतोड सुरू झाली आहे. त्यामुळे आता ‘संविधान बचावा’ची चळवळ सुरू झाली पाहिजे. डॉ. बाबासाहेबांनी तयार केलेल्या राज्यघटनेचं संरक्षण हा ‘राजकीय अजेंडा’ झाला पाहिजे.”

पंतप्रधानांच्या विरोधात बोलणं हा ‘देशद्रोह’ समजला जाऊ लागला आहे. या परिस्थितीतून पुढं काय निर्माण होईल, याचं विश्लेषण करत हात बांधून चूप बसण्याची ही वेळ नाही. चर्चा करण्याऐवजी काय निर्माण व्हायला हवं, यासाठी संघर्ष करण्याची वेळ आली आहे. यात जेवढे लोक पुढे येतील, त्यांना बरोबर घेऊन थेट संघर्ष सुरू करायला. हवा. प्रसंगी आपल्याला प्रस्थापित विचारवंत ‘वेडे’ म्हणतील, पण संघर्ष सुरू करायला हवा. गप्प बसण्याची ही वेळ नाही.......