प्रख्यात रहस्यकथाकार गुरुनाथ नाईकांना आर्थिक मदतीची गरज
ग्रंथनामा - वाचणारा लिहितो
निवेदन
  • प्रख्यात रहस्यकथाकार गुरुनाथ नाईक
  • Fri , 22 September 2017
  • ग्रंथनामा Granthanama वाचणारा लिहितो गुरुनाथ नाईक Gurunath Naik

‘कॅप्टन दीप’, ‘गोलंदाज’, ‘धुरंधर’, ‘शिलेदार’, ‘गरूड’, ‘शब्दवेधी’, ‘रातराणी’ ही व्यक्तिरेखांची नावं उच्चारताच मराठी वाचकांच्या एका पिढीला ज्यांची आठवण होते, ते हजाराहून अधिक रहस्यमय कादंबऱ्या लिहिणारे विक्रमवीर लेखक आणि ज्येष्ठ पत्रकार गुरुनाथ नाईक सध्या गोव्यात विपन्नावस्थेशी आणि आजारांशी झुंज देत आहेत. 

७९ वर्षांचे नाईक गेली बारा वर्षं ब्रेन स्ट्रोकच्या आजारानं ग्रस्त आहेत. आता त्यांच्या छातीत इन्फेक्शन झाल्यानं त्यांच्यावर गोव्यातील मणिपाल रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मूळ गोव्याचे असलेल्या नाईक यांना काही पत्रकारांच्या पुढाकारानं गोवा सरकारकडून निवासासाठी भाड्यानं फ्लॅट मिळाला आहे आणि गोवा सरकारची दरमहा तीन हजार रुपयांची पेन्शनही त्यांना मिळते. मात्र, त्यांच्या आणि पत्नीच्या उदरनिर्वाहासाठी आणि औषधोपचारांसाठी अन्य कोणतंही उत्पन्नाचं साधन त्यांच्याकडे नाही. त्यांच्या निवडक पुस्तकांचे नव्यानं संच काढून त्यातून त्यांना काही घसघशीत आर्थिक तरतूद करून देण्याच्या दृष्टीनं प्रयत्न सुरू आहेत. मात्र, हा प्रकल्प वास्तवात यायला काही काळ जाईल. सध्याची निकड त्यातून भागणार नाही. त्यांचा मुलगा लातूरमध्ये एमएस्सीचं शिक्षण घेत आहे आणि तो कॉलेजखर्चही अर्धवेळ नोकरी करून भागवतो. नाईक यांना आर्थिक मदतीची गरज आहे. ती करण्याची क्षमता आणि इच्छा असलेल्यांनी कृपया पुढील बँक खात्यात रक्कम जमा करावी, ही विनंती.

स्टेट बँक ऑफ इंडिया, शाखा - पणजी

गुरुनाथ नाईक

खाते क्र. : 31180667793

आयएफएससी : SBIN0005554

.............................................................................................................................................

रहस्यकथांच्या या शहेनशहाला किंवा बादशहाला जाणून घ्या. ‘इन गोवा न्यूज’ या वृत्तवाहिनीने २२ डिसेंबर २०१२ रोजी प्रसिद्ध रहस्याकथाकार गुरुनाथ नाईक यांची मुलाखत तीन भागांत घेतली. ती पुढील लिंकवर पाहता, ऐकता येईल.

गुुरुनाथ नाईक यांची मुलाखत - भाग एक

गुुरुनाथ नाईक यांची मुलाखत - भाग दोन

गुुरुनाथ नाईक यांची मुलाखत - भाग तीन

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘बहिष्कृतां’च्या घरचे अन्न ‘बहिष्कृतां’प्रमाणेच उपेक्षिले गेले. त्यामुळे ‘ब्राह्मणेतर खाद्यसंस्कृती चळवळी’ने आपली ‘देशी’ बाजू जगापुढे मांडायला सुरुवात केलीय...

स्वच्छता व शुद्धता या दोहोंना अस्पृश्यतेचा मोठा संदर्भ आहे. ज्यांना शिवायचे नाही ते अस्पृश्य. त्यांनी जवळ यायचे नाही की, शेजार करायचा नाही, हा ब्राह्मण व सवर्ण यांचा नियम. घाणीची कामं ज्यांना वर्णाश्रम धर्माप्रमाणे करायला लावली, त्यांना घाण समजून अस्पृश्य ठरवण्यात आले. साहजिकच ही माणसं कशी जगतात, काय खातात-पितात, काय विचार करतात, याची जाणीवच वरच्या तिन्ही वर्णांना म्हणजेच सवर्ण जातींना नव्हती.......

किणीकरांना सगळी दर्शने कळत होती आणि अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती काव्यात उतरवता येत होती. आणि अजून मोठी गोष्ट म्हणजे ते काव्य चार ओळींपुरते सुटसुटीत ठेवता येत होते

किणीकरांवर मानवेंद्रनाथ रॉय ह्यांच्या विचारसरणीचा मोठा प्रभाव होता. त्यांच्या नावावरूनच त्यांनी स्वतःला ‘रॉय’ हे नाव घेतले होते. रॉय यांनी 'रॅडिकल ह्यूमॅनिझम’चा पुरस्कार केला. त्या काळच्या महाराष्ट्रात अनेक नेत्यांवर, लेखकांवर आणि विचारवंतांवर रॉय ह्यांचा प्रभाव पडला होता. रॉय ह्यांनी क्रांतीचा मार्ग नाकारला असला, तरी त्या काळी तरुण असलेल्या किणीकरांना मनात कुठेतरी क्रांतीचे आकर्षण वाटले असणार.......

म्हटले तर हा ग्रामीण राजकारण उलगडून सांगण्याचा खटाटोप आहे अन् म्हटले तर शेतकऱ्यांना लुबाडणाऱ्या व्यवस्थेला पर्याय उभे करणाऱ्या पुढच्या पिढीतील शेतकरी तरुणांचा संघर्ष आहे

ही केवळ भानुदासराव पाटील, विक्रम शिंदेचीच कथा नाही, तर आबासाहेब जाधव, दिनकरराव पाटील यांच्यासारख्या लोकशाही प्रक्रियेने उदयास आलेल्या नव्या सरंजामदारांचीही गोष्ट आहे. आर्थिक संसाधनांच्या बळावर वाट्टेल तेवढा पैसा मोजून निवडणुका जिंकणारे, मतदारांचा कौल फिरवणारे आबासाहेब, दिनकरराव केवळ हैबतपुरातच नव्हे, महाराष्ट्रात सगळ्याच मतदारसंघांत दिसून येतात, पण.......

या पुस्तकातल्या ‘बिटविन द लाईन्स’ नीट वाचल्या, तर आजच्या मराठी पत्रकारितेची ‘अवनत’ अवस्था आणि तिची ‘ऱ्हासपरंपरा’ नेमकी कुठून सुरू झाली, हे लख्खपणे समजते!

आपल्या गुणी-अवगुणी सहकाऱ्यांकडून उत्तम ते काढून घेण्यापासून, समाजातल्या व्यक्ती-संस्था यांचं योगदान नेमकेपणानं अधोरेखित करण्यापर्यंत बर्दापूरकरांचा सर्वत्र संचार राहिला. त्यामुळे त्यांच्या पत्रकारितेला सत्त्व, नैतिक बळ आणि गांभीर्याची झळाळती झालर लाभत राहिली. आजच्या मराठी पत्रकारितेच्या संदर्भात त्या झालरीचा ‘थर्मामीटर’ म्हणून वापर केला, तर जे ‘तापमान’ कळतं, ते काळजी करावं, असंच आहे.......

लोकशाहीबद्दल आस्था किंवा काळजी व्यक्त करणं, ही काही लोकांचीच जबाबदारी आहे, हा समज खोडून काढायचा तर कामच केलं पाहिजे. ‘लोकशाही गप्पा’ हे त्या व्यापक कामाच्या गरजेतून आलेलं छोटंसं काम आहे

पुरेशी मेहनत करून आणि संवादाच्या सर्व शक्यता खुल्या ठेवून लोकांशी बोललं गेलं, तर प्रत्येकाच्याच आकलनात वाढ होते. आणि हळूहळू भूजलाची पातळी उंचवावी, तसं लोकशाहीबद्दलचं भान सखोल होण्याची शक्यता निर्माण होते. आपल्या भोवतीच्या गदारोळातून एकमेकांचा हात धरून, एका सजग आणि जिवंत लोकशाहीच्या मुक्कामापर्यंत मैदान मारणं आपल्याला सहज शक्य आहे. त्यासाठी एकमेकांना शुभेच्छा देणं एवढं तरी आपण करूच शकतो. ते मनःपूर्वक करू या!.......