टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • ट्रम्प पितापुत्र, केअर वर्ल्ड, तटकरे काका-पुतणे, अमित शहा आणि न्यूज टाइम आसाम
  • Mon , 07 November 2016
  • टपल्या टिक्कोजीराव Taplya Tikkojirao

१. एनडीटीव्ही इंडियाबरोबर आणखी दोन वाहिन्यांवर एकेक दिवसाची बंदी

अहाहा, केवढा हा निष्पक्षपातीपणा! पण जो बूँद से गयी, वो हौद से नहीं आती आणि एका बंदीने दुसरी बंदी समर्थनीय ठरत नाही. दुसरी एखादी ट्रिक शोधा राव!

......................................

२. काका सुनील तटकरे यांच्यावर नाराज पुतणे संदीप तटकरे यांचा शिवसेनेत प्रवेश

हिंदी फिल्मी डायलॉगच मारायचा, तर ‘जो सगे भतीजे के नहीं हो सके वो किसी और के भतीजे के क्या होंगे?’ अहो संदीपभौ, तुमचा पत्ता चुकला काय? नाराज पुतण्या पक्ष तर वेगळाच आहे.

......................................

३. दिल्लीला प्रदूषणाचा भयंकर विळखा, शाळांना तीन दिवसांची सुटी, कारखान्यांवरही पाच दिवसांची उत्पादनबंदी

त्यापेक्षा राजधानीतल्या सर्वपक्षीय राजकारण्यांना सक्तीने आपापल्या गावी पाठवून दिलं, तर वैचारिक, भावनिक, बौद्धिक आणि ध्वनिप्रदूषणात प्रचंड घट होईल आणि प्रदूषित पर्यावरणातही दिल्लीकरांचं जगणं अधिक सुसह्य होईल, नाही का?

...................................

४. उत्तर प्रदेशाच्या मतदारांनो, सपा आणि बसपला खूप संधी दिलीत, आता भाजपला द्या. भाजपमध्ये गुंड नाहीत : अमित शाह

किमान हे भाषण करायला तरी वेगळ्या कुणाला पाठवायचं होतं राव. आता सगळे फ्यॅ करून हसत असतील पोट धरधरून वेडपटासारखे!

......................................

५. डोनाल्ड ट्रम्प यांचा मुलगा एरिक याची फ्लोरिडामध्ये मंदिराला भेट, आरतीत सहभाग, भारतीयांची मतं वडलांकडे वळवण्याची धडपड

इतकी काही धडपड करायची गरज नाही एरिकभाऊ, आमच्या अनिवासी बांधवांनाही तोंडाळ, आक्रस्ताळे, द्वेष पसरवणारे नेते फार्फार आवडतात. तुम्ही फक्त रवीशला ‘रबिश’, सेक्युलरला ‘फेक्युलर’, लिबरलला ‘लिबटार्ड’, पुरोगामीला ‘फुरोगामी’, विचारवंतला ‘विचारजंत’ म्हणायला शिका. आमच्या मतांचा पाऊस पडेल तुमच्या पिताश्रींवर.

.........................

६. दहशतवादाशी मुकाबला करण्यासाठी भारत-चीन यांच्यात देवाणघेवाण करण्याचा राष्ट्रीय सल्लागार सुरक्षा बैठकीत निर्णय

पाकिस्तानबरोबर लष्करी सराव आणि भारताबरोबर नुसतेच ठराव? बहुत नाइन्साफी है...

editor@aksharnama.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण पंधरावे - ‘देश धोक्यात आहे’, असे हिंदुत्ववादी आणि लिबरल दोघांनाही वाटत होते. हिंदुत्ववाद्यांना वाटत होते, मुसलमानांकडून धोका आहे; लिबरल्सना वाटत होते, फॅसिस्ट शक्तींकडून...

२०१४पासून धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह अनेक मतदारांना पडला, हे नाकारता येणार नाही. हे घडून आले, याचे कारण भारताला गांधीजींच्या धर्मभावनेवर आधारलेल्या राजकारणाच्या विचारांचा विसर पडला होता, हे असेल का, असा विचार अनेकांच्या मनात तरळून जाऊ लागला. ‘लिबरल विचारवंत’ स्वतःशी म्हणत होते की, भारतीय जनतेला पडलेला धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह हे फक्त इतिहासाचे एक छोटेसे आवर्तन आहे.......

बंद करा ‘निर्भय बनो!, या राष्ट्राची ‘भयमुक्ती’च्या दिशेनं इतकी वेगानं वाटचाल चालू असताना, तुम्ही पण ‘निर्भय’ व्हा की! ‘राष्ट्रीय प्रवाहा’त सामील व्हा! बंद करा, तुमचं ते ‘निर्भय बनो’!

पोलीस शांत बसणार किंवा मदत करणार, याची खात्री असेल तरच ‘निर्भय’ता येणारच ना? निःशस्त्र सामान्य माणसं-मुलं मारणं, शत्रूच्या स्त्रियांवर बलात्कार करणं, हे शौर्यच आहे. म्हणजे ‘निर्दय बनो!’ हाच आजचा मंत्र आहे. एकच पक्ष, एकच नेता, त्याचा एकच उद्योगपती, एकच कायदा, एकच देव एकच भाषा, असं सगळं ‘एकी’करण झालं की, ते पूर्ण ‘निर्भय’ होतील. एकदा ते पूर्ण ‘निर्भय’ झाले की, जग ‘भयमुक्त’ झालंच समजा .......

बाबा आढाव : “भारतीय संविधानाची मोडतोड सुरू झाली आहे. त्यामुळे आता ‘संविधान बचावा’ची चळवळ सुरू झाली पाहिजे. डॉ. बाबासाहेबांनी तयार केलेल्या राज्यघटनेचं संरक्षण हा ‘राजकीय अजेंडा’ झाला पाहिजे.”

पंतप्रधानांच्या विरोधात बोलणं हा ‘देशद्रोह’ समजला जाऊ लागला आहे. या परिस्थितीतून पुढं काय निर्माण होईल, याचं विश्लेषण करत हात बांधून चूप बसण्याची ही वेळ नाही. चर्चा करण्याऐवजी काय निर्माण व्हायला हवं, यासाठी संघर्ष करण्याची वेळ आली आहे. यात जेवढे लोक पुढे येतील, त्यांना बरोबर घेऊन थेट संघर्ष सुरू करायला. हवा. प्रसंगी आपल्याला प्रस्थापित विचारवंत ‘वेडे’ म्हणतील, पण संघर्ष सुरू करायला हवा. गप्प बसण्याची ही वेळ नाही.......