टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • अरविंद केजरीवाल, गौतम गंभीर, एनडीटीव्ही आणि अली जफर
  • Sat , 05 November 2016
  • टपल्या टिक्कोजीराव Taplya Tikkojirao

. करण जोहरच्या आगामी ‘डियर जिंदगी’मध्येही अली जफर हा पाकिस्तानी कलाकार; त्याची भूमिका कायम राहणार.

म्हणजे या सिनेमाच्याही जाहिरातीचं कंत्राट मनसेलाच मिळणार तर!

२. संवेदनशील कारवाईची दृश्ये दाखवल्याच्या नावाखाली एनडीटीव्हीवर केंद्र सरकारची ‘ब्लॅकआउट’ कारवाई

अरेरे, फक्त एकच दिवस? उद्यापासून त्या देशद्रोही, फेक्युलर, फुर्रोगाम्यांची देशविघातक बडबड पुन्हा सुरू होणार? छ्या!! मोदी फारच मवाळैत बुवा! जरा पर्रीकरांकडून शिका म्हणावं काहीतरी.

३. भाजपवाले ना हिंदूंचे आहेत ना मुस्लिमांचे; ते आपल्या बापाचेही होऊ शकत नाहीत. त्यांना फक्त मतं मिळवायची आहेत : केजरीवालांची असभ्य टीका

केजरीवाल भाऊ, स्वपाय स्वमुखात घालण्याचा (फूट इन माउथ) रोग जडवून घेऊ नका… आता तुम्ही किती सडेतोड युक्तिवादाचा मुद्दा मांडलाय, हे कोणी पाहणारच नाही, सगळे ‘बाप’च डोक्यावर घेऊन नाचणार. फुकट गेला ना बार!!

४. लंडनचा तरुण चिंचपोकळीच्या गणपती मंडळाचे टी शर्ट घालून जगप्रदक्षिणा करणार

अरेरे, इतकी जबरदस्त बातमी थोडी उशिराने आली… पत्रकारितेतले सर्वोच्च पुरस्कार नुकतेच देऊन झाले… पुढच्या वर्षी चान्स पक्का आहे पण. आता हा तरुण सायकलवरून जिथे जाईल तिथे लोक त्याची वास्तपुस्त करण्याआधी त्याचं टी शर्ट पाहून त्याचीच विचारणा करणार – ‘कुठून घेतलं? कुणी दिलं?’ आपल्याकडच्या मंडळाची ख्याती जगभर पसरणार… वाजवा रे वाजवा!

५.वायूप्रदूषणाने श्वास कोंडलेल्या दिल्लीत दिवाळीत वाजलेल्या फटाक्यांवर क्रिकेटपटू गौतम गंभीरची जोरदार टीका; दिल्लीकरांचे कान उपटले.

बा गौतमा, क्रिकेटपटू आहेस ना तू? तरी इतकी सेन्सिबल आणि जनमानसाच्या विरोधात जाणारी भूमिका कशी घेतोस? घरचे, दारचे, आसपासचे सगळे लोक फुप्फुसं फुटून किंवा कान किटून मेले, तरी हरकत नाही, पण फटाके वाजवणं हा आमचा जन्मसिद्ध अधिकार आहे, ते फार महान धार्मिक कृत्यही आहे. आता चीनमध्ये जन्मलेले फटाके दिव्यांच्या सणात कुठून घुसले, असे देशद्रोही प्रश्न विचारू नकोस. पुढच्या सीझनमध्ये हिरव्या जर्सीत खेळायचंय का?

 

editor@aksharnama.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण पंधरावे - ‘देश धोक्यात आहे’, असे हिंदुत्ववादी आणि लिबरल दोघांनाही वाटत होते. हिंदुत्ववाद्यांना वाटत होते, मुसलमानांकडून धोका आहे; लिबरल्सना वाटत होते, फॅसिस्ट शक्तींकडून...

२०१४पासून धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह अनेक मतदारांना पडला, हे नाकारता येणार नाही. हे घडून आले, याचे कारण भारताला गांधीजींच्या धर्मभावनेवर आधारलेल्या राजकारणाच्या विचारांचा विसर पडला होता, हे असेल का, असा विचार अनेकांच्या मनात तरळून जाऊ लागला. ‘लिबरल विचारवंत’ स्वतःशी म्हणत होते की, भारतीय जनतेला पडलेला धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह हे फक्त इतिहासाचे एक छोटेसे आवर्तन आहे.......

बंद करा ‘निर्भय बनो!, या राष्ट्राची ‘भयमुक्ती’च्या दिशेनं इतकी वेगानं वाटचाल चालू असताना, तुम्ही पण ‘निर्भय’ व्हा की! ‘राष्ट्रीय प्रवाहा’त सामील व्हा! बंद करा, तुमचं ते ‘निर्भय बनो’!

पोलीस शांत बसणार किंवा मदत करणार, याची खात्री असेल तरच ‘निर्भय’ता येणारच ना? निःशस्त्र सामान्य माणसं-मुलं मारणं, शत्रूच्या स्त्रियांवर बलात्कार करणं, हे शौर्यच आहे. म्हणजे ‘निर्दय बनो!’ हाच आजचा मंत्र आहे. एकच पक्ष, एकच नेता, त्याचा एकच उद्योगपती, एकच कायदा, एकच देव एकच भाषा, असं सगळं ‘एकी’करण झालं की, ते पूर्ण ‘निर्भय’ होतील. एकदा ते पूर्ण ‘निर्भय’ झाले की, जग ‘भयमुक्त’ झालंच समजा .......

बाबा आढाव : “भारतीय संविधानाची मोडतोड सुरू झाली आहे. त्यामुळे आता ‘संविधान बचावा’ची चळवळ सुरू झाली पाहिजे. डॉ. बाबासाहेबांनी तयार केलेल्या राज्यघटनेचं संरक्षण हा ‘राजकीय अजेंडा’ झाला पाहिजे.”

पंतप्रधानांच्या विरोधात बोलणं हा ‘देशद्रोह’ समजला जाऊ लागला आहे. या परिस्थितीतून पुढं काय निर्माण होईल, याचं विश्लेषण करत हात बांधून चूप बसण्याची ही वेळ नाही. चर्चा करण्याऐवजी काय निर्माण व्हायला हवं, यासाठी संघर्ष करण्याची वेळ आली आहे. यात जेवढे लोक पुढे येतील, त्यांना बरोबर घेऊन थेट संघर्ष सुरू करायला. हवा. प्रसंगी आपल्याला प्रस्थापित विचारवंत ‘वेडे’ म्हणतील, पण संघर्ष सुरू करायला हवा. गप्प बसण्याची ही वेळ नाही.......