मोदींची सर्वोत्तम खेळी?
पडघम - देशकारण
विनोद शिरसाठ
  • व्यंकय्या नायडू, नरेंद्र मोदी आणि रामनाथ कोविंद
  • Tue , 01 August 2017
  • पडघम देशकारण रामनाथ कोविंद Ram Nath Kovind व्यंकय्या नायडू Venkaiah Naidu नरेंद्र मोदी Narendra Modi

देशाच्या राष्ट्रपती व उपराष्ट्रपती या दोन सर्वोच्च पदांवर कोण येणार, याबाबत महिनाभरापूर्वी कमालीची उत्कंठा होती. कोणाकडेही ठोस व तर्कशुद्ध अंदाज नव्हता, मोदींच्या मनात काय आहे याचा सुगावा कोणालाही लागत नव्हता. त्यामुळे, नावे अनेक चर्चेत येत होती, पण त्यांना कसलाही आधार नव्हता. स्वातंत्र्योत्तर भारताच्या सात दशकांच्या इतिहासात पहिल्यांदाच भाजपला आपल्या मनासारखे राष्ट्रपती व उपराष्ट्रपती निवडण्याची संधी प्राप्त झाली होती, त्यांच्या मार्गात कसलाही अडथळा नव्हता. एका बाजूला निवडून आणण्याएवढे बहुमत पाठीशी आहे आणि दुसऱ्या बाजूला विरोधी पक्ष विस्कळीत व गर्भगळीत अवस्थेत आहेत. अशा परिस्थितीत, भाजप व संघपरिवाराचे सदस्य राहिलेल्या व त्यांच्या विश्वासातल्या व्यक्ती राष्ट्रपती व उपराष्ट्रपती होणार हे उघड होते. पण त्यांचा मूळ अजेंडा (हिंदुत्वाचा) राबवण्याची इच्छा-आकांक्षा असलेली माणसे निवडली गेली तर देशाचे काही खरे नाही, अशी भीती बुद्धिवादी वर्तुळातून व्यक्त होत होती. परिणामी पुरोगाम्यांच्या गोटात चिंतेचे वातावरण होते.

अशा पार्श्वभूमीवर रामनाथ कोविंद व व्यंकय्या नायडू या दोन व्यक्तींची त्या दोन पदांवर निवड होणे, हा प्रकार बुद्धिवादी व पुरोगाम्यांना दिलासादारक ठरला. ते दोघेही भाजप व संघाचे अनुयायी असले तरी, कडवट हिंदुत्ववादी अशी त्यांची प्रतिमा नाही, त्यांच्या नावावर म्हणावेत असे वाद नाहीत आणि त्यांचे स्वतःचे असे खास प्रभावक्षेत्रही नाही. त्यामुळे त्यांच्यावर टीका करता येणे विरोधी पक्षांना व अन्य लोकांनाही अवघड होऊन बसले आहे. एवढेच नाही तर, विरोधी पक्षांच्या वतीने दिले गेलेले मीराकुमार व गोपालकृष्ण गांधी हे दोन चांगले उमेदवार असूनही, निवडणुकीत जराही रंगत आली नाही. आम्ही ही निवडणूक विचारांच्या आधारावर लढवतोय, हा विरोधी पक्षांचा मुळातला क्षीण दावा, ना माध्यमांनी गांभीर्याने घेतला, ना सर्वसामान्य जनतेने. परिणामी ही निवडणूक अगदीच एकतर्फी व रंगहीन झाली. एका मर्यादित अर्थाने या दोन्ही सर्वोच्च पदांवर नियुक्त्या झाल्या, निवडणूक नव्हे; असेही म्हणता येईल. अर्थातच भारतीय लोकशाहीच्या दृष्टीने हे स्पृहणीय नाही.

या निवडणुकीसाठी निवडलेल्या दोन्ही उमेदवारांचे कार्यकर्तृत्व व प्रतिमा पाहता, पंतप्रधानांच्या मानसिकतेवर काहीअंशी प्रकाश पडतो. हे खरे आहे की, दोन्ही उमेदवार मोदींच्या मर्जीतले आहेत, पण संभाव्य वाद टाळणारेही आहेत. या दोघांच्या निवडीमुळे मोदींवर व भाजपवर बुद्धिवादी वर्तुळातून होणारी संभाव्य टीका टळली आहे. पुरोगाम्यांचा रोषही त्यामुळे काहीअंशी बोथट झाला आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीसाठी मोदींच्या दृष्टीने ही जमेची बाजू राहील. कारण भाजपला आपला मूळ अजेंडा राबवण्यासाठी ही चांगली संधी होती. हिंदुत्ववादी प्रतिमा असलेले राष्ट्रपती व उपराष्ट्रपती निवडून आणले असते तर संघपरिवाराला व भाजपला आपल्या वैचारिक विरोधकांवर निर्विवाद विजय मिळवल्याचे समाधान मिळवता आले असते. परंतु या समाधानापेक्षा आपला वैचारिक विरोध बोथट करणे आणि आगामी लोकसभा निवडणूक सोपी करणे अशी धूर्त खेळी पंतप्रधानांनी खेळली आहे.

याचाच अर्थ पंतप्रधानांनी संसदीय लोकशाहीचे बलस्थान ओळखले आहे आणि आपल्याला मिळालेला जनादेश संघपरिवाराचा मूळ अजेंडा राबवण्यासाठी नाही, हेही लक्षात घेतले असावे. कदाचित तो अजेंडा राबवण्याची वेळ अद्याप आलेली नाही असाही अर्थ मोदींनी लावलेला असू शकतो. दीर्घ पल्ल्याची राजकीय वाटचाल करण्याची इच्छा व आकांक्षा असलेले नेते अशा धूर्त खेळी खेळण्यात वाकबगार असतात. मोदींची वाटचाल या दिशेने होत असल्याची ही एक खूण मानता येईल. त्या अर्थाने विचार केला तर सर्वोच्च पदावरील या दोन निवडी करण्यामध्ये सर्वांचे अंदाज सपशेल चुकवून

मोदींनी आपल्या कारकिर्दीतील (स्वत:साठी व भाजपसाठी) खेळलेली ही सर्वोत्तम खेळी ठरेल.

(‘साधना’ साप्ताहिकाच्या ५ ऑगस्ट २०१७च्या अंकातून साभार.)

vinod.shirsath@gmail.com

लेखक साप्ताहिक ‘साधना’चे संपादक आहेत.

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

आठवलेसाहेब, तुमच्या मोदींनी गेल्या दहा वर्षांत ‘किती वेळा’ राज्यघटनेचे ‘पालन’ केले आहे? आणि ‘किती वेळा’ अनुसूचित जातींना ‘न्याय’ दिला आहे?

मुळात संविधान बदलाच्या चर्चेची सुरुवात भाजप आणि संघाच्या जबाबदार पदाधिकाऱ्यांनीच केलेली आहे. ‘संविधान बदलासाठी चारशेपेक्षा जास्त जागा द्या’ अशी मागणी भाजपच्या एका वरिष्ठ खासदाराने केली होती. गेल्या वर्षी मोदीचे आर्थिक सल्लागार बिबेक देबरॉय यांनी एक लेख लिहून संविधान बदलण्याची गरज असल्याचं सांगितलं होतं. त्यामुळे विरोधक बाबासाहेबांचा अपमान करताहेत, हा आठवलेंचा आरोप म्हणजे शुद्ध लबाडी आहे.......

‘जातवास्तव’ स्वीकारल्याशिवाय सत्ता आणि संसाधनांचा जातीय ‘असमतोल’ दूर करता येणार नाही. उमेदवारांची नावे जातीसकट जाहीर करणे, हा एक ‘सकारात्मक प्रयोग’ आहे

महायुतीच्या ३८ उमेदवारांपैकी १९ मराठा आहेत. विशेष म्हणजे हे सगळे श्रीमंत मराठे आहेत. महाविकास आघाडीच्या ३९ उमेदवारांपैकी २४ मराठा आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या ३२ उमेदवारांपैकी ५ अनुसूचित जाती, १३ ओबीसी आणि ४ मराठा आहेत. यावरून एक गोष्ट लक्षात येते की, मविआ असो वा महायुती एका विशिष्ट समाजाकडेच सत्ताबळ झुकलेले दिसते. मात्र वंबआने उमेदवारी देताना जात समतोल पाळलेला दिसतो.......

स्वयंपाकघरात टांगलेल्या कॅलेंडरवरच्या चित्राइतकीच थरारकता वा जाहिरातीतून एखादं उत्साहवर्धक पेय विकणार्‍या म्हातार्‍या अमिताभ बच्चनइतकीच विश्वासार्हता, दहा वर्षं राष्ट्रीय व्यासपीठावर वावरलेल्या मोदींच्या व्यक्तिमत्त्वामध्ये उरली आहे...

प्रचारसभांमधून दिसणारे पंतप्रधान दमले-भागलेले, निष्प्रभ झालेले आहेत. प्रमाणापलीकडे वापरलेली छबी, अतिरिक्त भलामण आणि अतिश्रम, यांमुळे त्यांची ‘रया’ गेल्यासारखी वाटते. एखाद्या ‘टी-ट्वेंटी’ सामन्यात जसप्रीत बूमराला वीसच्या वीस षटकं गोलंदाजी करायला लावावी, तसं काहीसं हे झालेलं आहे. आक्रसत गेलेला मोदींचा ‘भक्तपंथ’ टिकून असला, तरी ‘करिष्मा’ उर्फ ‘जादू’ मात्र चाकोरीबद्ध झालेली आहे.......

भाजपच्या ७६ पानी ‘जाहीरनाम्या’त पंतप्रधान नरेंद्र मोदींची तब्बल ५३ छायाचित्रं आहेत. त्यामुळे हा जाहीरनामा आहे की, मोदींचा ‘छायाचित्र अल्बम’ आहे, असा प्रश्न पडतो

काँग्रेसच्या ४८ पानी जाहीरनाम्यात राहुल गांधींची फक्त पाच छायाचित्रं आहेत. त्यातली तीन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत आहेत. याउलट भाजपच्या जाहीरनाम्याच्या मुखपृष्ठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीमागे बळंच हसताहेत अशा स्वरूपाचं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचं छायाचित्र आहे. त्यातली ‘बिटवीन द लाईन’ खूप सूचक आणि स्पष्टता सूचित करणारी आहे.......

जर्मनीत २० हजार हत्तींचा कळप सोडण्याची धमकी एका देशाने दिली आहे, ही ‘हेडलाईन’ जगभरच्या प्रसारमाध्यमांमध्ये गाजतेय सध्या…

अफ्रिका खंडातील बोत्सवाना हा मुळात गरीब देश आहे. त्यातच एवढे हत्ती म्हणजे दुष्काळात तेरावा महिना. शेतांमध्ये येऊन हत्ती मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान करत असल्याने शेतकरी वैतागले आहेत. याची दखल बोत्सवानाचे अध्यक्ष मोक्ग्वेत्सी मेस्सी यांनी घेतली आहे. त्यामुळेच त्यांनी संतापून एक मोठी घोषणा केली आहे. ती म्हणजे तब्बल २० हजार हत्तींचा कळप थेट जर्मनीमध्ये पाठवण्याची. अनेक माध्यमांमध्ये ही ‘हेडलाईन’ गाजते आहे.......