‘लव जिहाद’ असो की ‘समान नागरी कायदा’, यांचा मूळ हेतू स्त्रियांना दुय्यम ठेवण्याचा आहे. त्यामुळेच त्यांना राजकारणात महत्त्व प्राप्त होते. स्त्रियांनी हे सत्य जाणून भानावर यायला हवे

हे दोन्ही कायदे स्त्री-स्वातंत्र्य मर्यादित करणारे आणि स्त्रियांवर पुरुषसत्ताक गुलामी कायम ठेवणारे आहेत. ‘लवजिहाद’चा कायदा स्त्रियांना आपला जीवनसाथी निवडण्याचा मूलभूत अधिकार नाकारतो; ‘समान नागरी कायदा’ लग्न, घटस्फोट, पोटगी, दत्तक आणि वारसा याबाबतीत भरवसा देऊन स्त्रीला ‘पत्नी’ म्हणून मर्यादित करतो. आपली गुलामी आणि दुय्यम स्थान संपवणारे राजकारण स्त्रियांना ओळखता आले पाहिजे.......

नावल-अल-सदावी : अरब जगतातल्या पिचलेल्या-दबलेल्या स्त्रियांचाच नव्हे, तर समस्त जगातल्या न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या स्त्रियांचा बुलंद आवाज

नावल-अल-सदावी. स्त्री हक्कांसाठी आयुष्य पणाला लावलेली इजिप्तशियन स्त्रीवादी लेखिका-कार्यकर्ती. तिच्या विरोधाची धार स्त्री-सुंता करण्यासाठी वापरात येत असलेल्या पात्यापेक्षाही तीव्र-तीक्ष्ण. गेल्या वर्षी २१ मार्च रोजी वयाच्या ८९ व्या वर्षी सदावीचे निधन झाले. तसे अरब जगतातल्या पिचलेल्या-दबलेल्या स्त्रियांचाच नव्हे, तर समस्त जगातल्या न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या स्त्रियांचा बुलंद आवाज निमाला.......

सुशिक्षित, उच्च-सुशिक्षित स्त्रियांची भूमिका आता निश्चित होणे, हाच त्यांच्या मुक्तीचा मार्ग ठरणार आहे. सर्व प्रकारच्या शोषणातून मुक्त झाल्याशिवाय अस्सल अर्थाने स्त्री-मुक्ती साध्य होणार नाही!

निर्घृण पुरुषी सत्तेविरुद्ध दीर्घकाल युद्ध करून अतिशय कष्टाने मिळवलेल्या स्वातंत्र्याचा स्त्रिया खरेच आत्मविकासासाठी आणि सामाजिक पुनर्रचनेसाठी उपयोजन करतात का? वर्ण-जात संघर्षाचे युद्ध ते पुढे नेत आहेत का? त्यांचे पुन्हा नव्या स्वरूपात ‘वस्तूकरण’ तर होत नाही ना? हे आणि असे काही प्रश्न उपस्थित करणे आवश्यक आहे. स्त्री-स्वातंत्र्य युद्ध अनेक शतके ‘समांतर रीती’ने जगातील बहुतेक सर्व सभ्यतांमध्ये विकसित झाले.......

फुले दाम्पत्याच्या कार्यामुळे केवळ मुक्ता साळवेला ‘मुक्तीचा मार्ग’ मिळाला नाही, तो इतर सर्व स्त्रियांना मिळाला, तसाच तो तमाम पुरुषांनाही मिळावा!

गाव पातळीवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना हे सारं वास्तव माहिती असतं. स्वयंघोषित गुरू, बाबा, महाराज, योगी, साधू आणि त्यांच्या संस्था, देवस्थानं, आखाडे आणि त्यांचे सत्संग, स्वाध्याय यात जनता अडकलेली आहे. हे सारे उपक्रम स्त्रियांच्या दुय्यमत्वाला, अंधश्रद्धांना, रूढी-परंपरांना आणि विशिष्ट प्रकारच्या राजकीय विचाराला खतपाणी घालणारे असतात. या विचारांची समीक्षा करून मग ते स्वीकारावे, अशी मानसिकता निर्माण होत नाही.......